शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

२३ हेक्टरचा तलाव उरला ७.३१ हेक्टरचा

By admin | Published: May 29, 2015 12:58 AM

तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची राज्यात नोंद असली तरी काही तलाव बुजले तर बहुतांश तलाव अतिक्रमणधारकांनी बळकावले आहेत.

मोहन भोयर तुमसरतलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची राज्यात नोंद असली तरी काही तलाव बुजले तर बहुतांश तलाव अतिक्रमणधारकांनी बळकावले आहेत. तुमसर तालुक्यातील आष्टी येथे सर्वाधिक ५८ तलाव होते. आता केवळ १४ तलाव शिल्लक राहिले असून २३ हेक्टरचे तलाव ७.३१ हेक्टरचे उरले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, तलावाच्या मालकीवरुन जिल्हा परिषद व लघुपाटबंधारे विभागाची एकमेकावर कुरघोडी सुरू आहे.भंडारा जिल्ह्यात शासनदप्तरी १,१५९ तलावांची नोंद आहे. तुमसर तालुक्यातील आष्टी गावात ५८ माजी मालगुजारी तलावांची नोंद आहे. प्रत्यक्षात या गावात केवळ १४ तलाव शिल्लक आहेत. आष्टी येथील मामा तलावाचे खोलीकरण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरु आहे. जिल्हा परिषदेने हा तलाव मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था, आष्टी या संस्थेला पाच वर्षाकरिता मासेमारीकरीता कंत्राटासाठी दिला आहे. तलावाचे क्षेत्रफळ ७.३१ हेक्टर आहे. येथे केवळ एक हेक्टरमध्ये पाणी असतो. सन १९८० च्या रेकॉर्डनुसार हा तलाव २३ हेक्टरमध्ये असल्याची नोंद आहे. जिल्हा परिषदेने आतापर्यंत तलावाचे खोलीकरण करण्याची तसदी घेतली नव्हती. तलावाचे खोलीकरण न झाल्याने तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीचा विस्तार करून तलावात अतिक्रमण केले. त्या खोलीकरणाला शेतकऱ्यांनी विरोध केला. तलावाचे खोलीकरण झाले असते तर पाण्याची पातळी वाढून त्याचा सिंचनाकरिता लाभ झाला असता. या तलावाची लीज (भाडेतत्व) जिल्हा परिषदेमार्फत नियमित घेतली जात असल्यामुळे हा प्रकार मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तलाव खोलीकरणाची मागणी केली असता हा विषय ग्रामपंचायतीचा असून स्थानिक स्तरावर प्रश्न निकाली काढण्यासाठी सांगितले. उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवरतलावाच्या शेजारी शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी वापर सहकारी संस्था सुरु केल्या आहेत. याच संस्थेचे पदाधिकारी तलावावर अतिक्रमण करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात मासेमारी उद्योग नावापुरतेच शिल्लक आहे. दीड लक्ष मासेमार बांधवांची लोकसंख्या असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.चौकशी करण्याची मागणीयासंदर्भात मच्छिंद्र मत्स्यपालन संस्थेने तुमसर येथील भूमापन कार्यालयाकडे ७,५०० रुपये भरुन तलावाची मोजणी करण्यासाठी अर्ज केला. अधिकाऱ्यांनी तलावस्थळी येऊन तलावाचे मोजमाप न करता शेजारील शेतीचे मोजमाप करून तलावाची सीमा आखून दिली. तीन बाजूंनी तलावाची नवीन पाळ अस्तित्वात येत असून तलावालगतच्या शेतकऱ्यांना १० एकरावर जागा मिळाली आहे. यात भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी चुकीचे मोजमाप केले असून याप्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार केवट, आनंद भुरे, संजय मोहनकर आणि संजय केवट यांनी केली आहे. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मत्स्यपालन सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.