शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

वीज कोसळल्याने ४ वर्षात २६ जणांचा मृत्यू; १६ प्रस्तावांना मंजूरी केव्हा?

By युवराज गोमास | Published: May 14, 2024 6:51 PM

जिल्ह्यात कोसळणारी वीज थांबणार कधी? : यंदा ११ जनावरांचा मृत्यू

भंडारा : जिल्ह्यात सन २०२२ ते २०२३ या कालावधीत वीज कोसळून २६ जणांचा जीव गेला. यंदा अवकाळीत जीवहानी झाली नसली तरी ११ जनावरांचा मृत्यू झाला. परंतु, जिल्ह्यात एकही ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने यंदा सुधारीत १६ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले. परंतु, अद्यापही मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोसळणारी थांबणार तरी केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात वीज कोसळून सर्वाधिक मृत्यू शेतशिवारात, मोकळ्या जागेत झाले आहेत. सध्या जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसासह विजेच्या कडकडाटाने थैमान घातले आहे. यामुळे उन्हाळी धान पीक व भाजीपाला पीक संकटात सापडले आहेत. कुठे ना कुठे वीज कोसळण्याची चिन्हे दिसून येतात. घराबाहेर पडायची भीती नागरिकांत असते.

जिल्ह्यात २०२० मध्ये वीज कोसळून चार जणांचा बळी गेला. यात भंडारा, पवनी व तुमसर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. २०२१ मध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. यात भंडारा, तुमसर तालुक्यातील प्रत्येकी एक, तर मोहाडी तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे. २०२२ मध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. यात भंडारा एक, पवनी तीन, तर तुमसर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.

काय आहे वीज अटकाव यंत्रणा?

शहरातील सर्वाधिक उंच इमारतीवर वीज अटकाव यंत्रणा कार्यन्वित केली जाते. ही यंत्रणा १०० मीटर परिसरात वीज कोसळण्यास अटकाव करते; परंतु यासाठी लाखोंचा खर्च येतो. जिल्ह्यात अशी यंत्रणा कुठेही नाही.

सुधारीत प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा कार्यन्वित करण्यासंबंधीचे सुधारीत १६ प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापच्यावतीने शासनाकडे पाठविले आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये यासंबंधीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते; परंतु कुठेही प्रश्न निकाली निघाला नाही.

जिल्ह्यात एकही यंत्रणा कार्यान्वित नाही

जिल्ह्यात १३३० मिलिमीटर पाऊस होतो. सध्या विजेच्या कडकडाटासह अवकाळी मुसळधार पाऊस कोसळत आहे. विजेच्या धक्क्याने चार वर्षांत २६ जणांचा बळी गेला. परंतु, अद्यापही वीज अटकाव यंत्रणा एकाही ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांत सातत्याने भीतीचे वातावरण पाहावयास मिळते.

मृताच्या कुटुंबियांना मिळणारी मदतशासनाच्यावतीने मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत दिली जाते. ४० ते ६० टक्के अपंगत्वासाठी यापूर्वी ५९,१०० तर आता ७४ हजार, ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्वासाठी पूर्वी दोन लाख तर आता २.५० लाख, एक आठवड्यापेक्षा जास्त काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यास पूर्वी १२,७०० तर आता १६ हजार व त्यापेक्षा कमी काळ उपचारासाठी पूर्वी ४,३०० तर आता ५४०० रुपयांची मदत दिली जाते.

जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यासंबंधीचे १६ सुधारीत प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. सध्या विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होत आहे. नागरिकांनी मोकळ्या मैदानात व पावसात थांबू नये. दामिनी ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन माहिती घ्यावी.- अभिषेक नामदास, प्रमुख आपत्ती व्यवस्थापन, भंडारा. वीज पडून झालेले मृत्यू

वर्ष                मृत्यू संख्या

२०२४                ००२०२३                ०२

२०२२                १४२०२१                ०६

२०२०                ०४

टॅग्स :bhandara-acभंडाराDeathमृत्यू