शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

३०० एकर शेती वैनगंगेने केली गिळंकृत, शेतकरी होत आहेत भूमीहीन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 6:16 PM

नदीकाठ भूस्खलनाने वाढतोय : प्रवाह येतोय गावाच्या दिशेने, प्रशासन बेफिकीरच !

मोहन भोयरतुमसर : बेसुमार रेती उपशामुळे नदीचे पात्र तुमसर तालुक्याच्या उमरवाडा, बोरी व कोष्टी या गावाच्या दिशेने सखल झाले आहे. दरवर्षी पुरामुळे नदीकाठ भूस्खलन होत असून प्रचंड वेगाने शेती नदीत समाविष्ट होत आहे. एकट्या बोरी येथे सुमारे ३०० एकर शेती नदीपात्रात समाविष्ट झाली आहे. दरवर्षी नदीकाठ भूस्खलन होत असून त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथे तात्काळ संरक्षण भिंतीचे बांधकाम न केल्यास येत्या काही वर्षात ही तीन गावे नदीपात्रात समाविष्ट होण्याच्या धोका आहे.

तालुका मुख्यालयापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी उमरवाडा व कोष्टी या गावाच्या दिशेने झपाट्याने वैनगंगेचे नदीपात्र पुढे सरकत आहे. त्यामुळे या तिन्ही गावांना धोका निर्माण झाला आहे. मागील वीस वर्षापासून नदीचे पात्र गावाच्या दिशेने झपाट्याने पुढे सरकत आहे. परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. एकट्या बोरी येथे सुमारे ३०० एकर शेती मागील २० वर्षात वैनगंगा नदीने गिळंकृत केली आहे. विनोद साखरवाडे या शेतकऱ्याची तर बारा एकर शेती नदीपात्रात समाविष्ट झाली. रोशनलाल मेश्राम यांची दहा एकर शेती नदीपात्रात गेली, दोन एकर तसेच तीन एकर अशी शेतकऱ्यांची शेती येथे नदीपात्रात समाविष्ट झाली. शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. दरवर्षी पुरात येथील शेतीमधील पीक नष्ट होत आहे. शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

नदीचा प्रवाह का वळला ?तुमसर व तिरोडा हे दोन्ही तालुके या नदीपात्राच्या काठावर आहेत. तुमसर व तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूच्या उपसा दरवर्षी केला जातो. त्याच्या परिणाम असा झाला की तुमसर तालुक्याच्या दिशेने नदीचे पात्र है सखल झाले असून एक ते दीड किलोमीटरच्या मोठा खट्टा येथे पडला आहे. पावसाळ्यात नदीच्या प्रवाह त्या सखलभागातून तुमसर तालुक्यातील गावाकडे वळणे सुरू झाले.

अनिल बावनकर यांनी केले होते प्रयत्न२०१० - ११ मध्ये आमदार अनिल बावनकर यांनी राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांना बोरी येथे वैनगंगेच्या नदी काठावर पाहणी करिता घेऊन आले होते. त्यांनी संरक्षण भिंत बांधण्याकरिता निधी देता येईल काय व एवढ्या विस्तीर्ण नदीला संरक्षण भिंत बांधण्यासंदर्भात सचिव स्तरावर चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यानंतर मात्र कोणतीही चर्चा झाली नाही.

नदीपात्र बदलण्याची गरजउन्हाळ्यात या गाव परिसरातील नदीचे पात्र उपसा करून समतल करण्याची गरज आहे. त्यामुळे तुमचा तालुक्यातील गावाकडील सखल भाग हा समतोल होईल. तसेच या गावाच्या दिशेने सुमारे दीड तो दोन किलोमीटर संरक्षण भित बांधल्यास नदीकाठाचे भूस्खलन होणार नाही. त्या करीता सुमारे ३० ते ३५ कोटी निधीची गरज आहे. हा निधी खेचून कोण आणणार, असा प्रश्न आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा