शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

३३८ शाळांत महिला शिक्षिकाच नाहीत; कसे होणार समुपदेशन ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 11:40 AM

ग्रामीण, शहरी भागात स्थिती सारखीच : यंत्रणेकडून अंमलबजावणीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नेहमीच अग्रेसर असतात. १ लाख ९६ हजार ९८१ विद्यार्थी जिल्ह्यातील शाळेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. यात विद्यार्थिनींची संख्याही मोठी आहे; मात्र शाळांची आणि विद्यार्थिनींची संख्या पाहता शाळांमध्ये शिक्षकांच्या तुलनेत महिला शिक्षक नसल्याने मुलींचे समुपदेशन कसे होणार, त्यांनी अडचण सांगायची तर कोणाला? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नेहमीच अग्रेसर असते. जिल्ह्यातील जि. प. शाळेच्या माध्यमातून दोन हजारांपेक्षा अधिक गुरुजी ज्ञानदानाचे काम करीत आहेत. जिल्ह्यात १२९७ शाळा आहेत. यात सुमारे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत दोन लाख विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

विद्यार्थिनींची संख्याही ९५ हजार ६९० आहे. दरम्यान, शाळांमध्ये मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी राज्यात खळबळ उडाली आहे. शाळेत शिकत असताना शिक्षणाबरोबरच मुलींना विविध अडचणींचा सामोरे जावे लागते. मुळातच मुली लाजाळू असल्याने आपल्या अडचणी स्पष्ट सांगू शकत नाहीत. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी महिला शिक्षक शाळेवर असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील ३३८ शाळांमध्ये महिला शिक्षिकाच नसल्याने मुलींनी अडचण सांगायची तर कोणाला अन् मुलींचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. 

बहुतांश शाळांत महिला शिक्षकच नाहीत जिल्ह्यात १२९७ शाळा आहेत. मात्र, यात बहुतांश शाळांमध्ये महिला शिक्षक नसल्याने मुलींनी अडचण सांगायची तर कोणाला? असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, बदलापूर येथील घटनेनंतर मुलींच्या संरक्षणासाठी शिक्षण विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

महिला शिक्षक केवळ ३३८ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची आणि विद्यार्थिनींची संख्या पाहता १२९७ शाळांमध्ये केवळ ३३८ महिला शिक्षक कार्यरत आहेत. यातच अनेक शाळांवर एकापेक्षा अधिक महिला शिक्षक कार्यरत असल्याने इतर शाळांमध्ये मात्र मुलींना महिला शिक्षकांची प्रतीक्षाच आहे.

शाळामध्ये दोन लाख विद्यार्थी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळेच्या माध्यमातून १ ली ते १२ वी पर्यंत १ लाख १ हजार २९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ९५ हजार ६९० विद्यार्थिनी शाळेतून धडे गिरवत आहेत.

कसे होणार मुलींचे समुपदेशन? 

  • ग्रामीण भागात जिपच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या सुमारे १२९७ शाळा आहेत. ग्रामीण भागातील गरिबांच्या मुलांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. 
  • मात्र, शाळांतील मुलींच्या अडचणी समजून घेण्यासाठीची जबाबदारी महिला शिक्षकांनी घेणे आता गरजेचे झाले आहे. मात्र, शिक्षकांची संख्या पाहता महिला शिक्षकांची संख्या अत्यंत कमी आहे.

उपाययोजना 

  • बदलापूर येथील घटनेनंतर सर्व शाळांत मुलीच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. 
  • तशा सूचनाही सर्व शाळांना दिल्या असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षकbhandara-acभंडारा