शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

८०९ गावांना टंचाईसदृश परिस्थितीतून वगळले

By admin | Published: November 19, 2015 12:17 AM

धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली.

खरीप पीक सुधारित पैसेवारी : ३७ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमीलोकमत विशेषदेवानंद नंदेश्वर भंडाराधानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली. यानंतरही जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची सुधारीत पैसेवारी ६२ पैसे घोषित केली आहे. यात ३७ गावांची ५० पैसेपेक्षा कमी तर ८०९ गावांची ५० पैसेपेक्षा अधिक पैसेवारी दाखविण्यात आली आहे. ८०९ गावातील शेतकऱ्यांना टंचाईसदृश्य परिस्थितीतून वगळण्यात आल्याने आता शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले आहे.भंडारा जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ६३ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड करण्यात आली. त्याची टक्केवारी ९८.७५ टक्के एवढी आहे. धानपिकाची ९७.६९ टक्के म्हणजेच १ लक्ष ७७ हजार ८६६ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली. खरीप हंगामात धानाचे उत्पादन कमालिचे घटल्याने शेतकऱ्यांवर बिकट परीस्थिती ओढावली आहे. कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या अंतिम पैसेवारीत ८०९ गावातील पीक स्थिती उत्तम दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा प्रशासनाने ८४६ गावांची अंतिम पैसेवारी ६२ पैसे दर्शविली आहे. यातील ३७ गावे ५० पैसेपेक्षा कमी तर ८०९ गावात ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. याविषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.भंडारा तालुक्यातील १६९ गावांची पैसेवारी ६८ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची पैसेवारी ६२ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ६४ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ६६ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ५७ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ५८ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ५९ पैसे दाखविण्यात आली आहे. लाखनी तालुक्यातील १०२ गावांपैकी ३७ गावे ५० पैसेपेक्षा कमी, तर ६५ गावे ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे.४३ गावे पैसेवारीतून बादभंडारा जिल्ह्यात एकूण ८८९ गावे आहेत. यात ८७५ गावे खरीप तर १४ गावे रब्बीची आहेत. २९ गावांत खरीप पिकाची लागवड करण्यात आली नाही. यात भंडारा तालुक्यातील १६, पवनी २, तुमसर ७, साकोली व लाखनी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. २९ गावे पिके नसलेली आहेत. पवनी तालुक्यातील १४ गावे रबी पिकाची आहेत. त्यामुळे त्या ४३ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. जिल्ह्यातील ८८९ एकूण गावांपैकी ८४६ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. ८४६ गावांच्या खरीप पिकांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. यात ८०९ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यावर्षी जिल्हा प्रशासनाने धान उत्पादक शेतकरी संकटात असतानाही सुधारित पैसेवारी ६२ पैसे दाखवून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप होत आहे़पैसेवारीत तीनदा बदलशासनाचे १६ सप्टेंबरच्या आदेशान्वये ६७ पैशांपेक्षा कमी-अधिक पैसेवारीच्या निकषानुसार जिल्ह्यात ७४ पैसे ही पैसेवारी १८ सप्टेंबरला घोषित केली. शासनाने २३ सप्टेंबरला पैसेवारीचे सुधारित निकष मागे घेऊन प्रचलित ५० पैशांपेक्षा कमी-अधिक प्रमाणात पैसेवारी घोषित करण्याच्या शासन निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्याची सुधारित नजर अंदाज पैसेवारी ७३ पैसे घोषित केली. राज्य शासनाने प्रचलित सुधारीत पैसेवारी १५ नोव्हेंबरला करण्याचे ठरविले होते. मात्र शासनाने ३ नोव्हेबर रोजी शासन निर्णय काढून सुधारित पैसेवारी ३१ आॅक्टोंबरला घोषित करण्याचा आदेश दिले. त्यामुळे जिल्हा प्रशासनात एकच संभ्रम निर्माण झाला. अखेर जिल्हा प्रशासनाने ७ नोव्हेबर रोजी सुधारीत पैसेवारी ६२ पैसे घोषित केली.