शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

प्रशासनाची ‘डाळ’ शिजेना!

By admin | Published: November 17, 2015 12:33 AM

महागाई आज ना उद्या कमी होईल, या अपेक्षेत असलेल्या लोकांची निराशा सुरूच आहे. सणासुदीच्या काळात याची तीव्रता अधिकच वाढली.

मार्चपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा : गावरान डाळही महागच, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढभंडारा : महागाई आज ना उद्या कमी होईल, या अपेक्षेत असलेल्या लोकांची निराशा सुरूच आहे. सणासुदीच्या काळात याची तीव्रता अधिकच वाढली. ग्राहकांनी आयात केलेल्या तूर डाळीकडे जवळपास कानाडोळा केला, तर दुसरीकडे गावरान तूर डाळीचे दर आकाशाला भिडले आहेत. चांगल्या प्रतिची तूर डाळ शंभर रूपयात मिळण्याची शक्यता मावळली आहे. दिवाळी संपली, परंतु स्वस्त डाळीचा अजूनही पत्ता नाही. मार्च-एप्रिलपर्यंत प्रतीक्षामागीलवर्षी आयात करण्यात आलेल्या डाळीची किंमत ७० ते ८० रुपये किलो होती. यंदा हीच किंमत प्रति किलो १२० ते १२५ रुपये इतकी आहे. गावराणी तूरडाळीची किंमत ८०-९० रुपये प्रति किलोपासून १३०-१४० रूपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे बाजारातील किमती वाढलेल्या आहेत. २०१६ मधील मार्च-एप्रिलमध्ये डाळीचे नवे उत्पादन झाल्यावरच या स्थितीत सुधारणा होऊ शकते, अशी माहिती आहे. स्थानिक थोक दुकानांमध्ये चांगल्या दर्जाची डाळ १७० ते १८० रुपये किलो होती. मध्यम दर्जाची गावराणी डाळ १४५ ते १५० रुपये किलो तर आयात करण्यात आलेल्या निम्न दर्जाच्या डाळीची किंमत ११० ते १२० रुपये किलो होती.किराणा व्यापारी आनंदराव चरडे यांनी सांगितले की, तूर डाळ आणि चणा डाळीचे भाव कमी झाले आहेत. शासनाने डाळीवर लावलेला आयात कर हटविल्यामुळे आणि देशाच्या काही राज्यातून तूर डाळीची आवक करण्यात आली. चांगल्या दर्जाची तूरडाळ (फटका) १४० ते १६० रूपये आणि तूरडाळ (फोड) १२० ते १३५ रूपये प्रतिकिलोच्या दराने विकली जात आहे. चणाडाळही ६० ते ६५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. आयातीत तूर डाळीचे भाव ११५ रूपयांवरून १०३ रूपयांवर पोहोचले आहेत. आयात डाळीकडे ग्राहकांची पाठतूर डाळ आणि चणा डाळीचे दर वाढल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले होते. डाळीचे साठे करणाऱ्यांवर प्रशासनाने धाडी टाकून मोठ्या प्रमाणात डाळ आणि सोयाबीन जप्त केले. डाळ मिलर्ससोबत मिळून स्वस्त डाळ ग्राहकांना पुरविण्यात येऊ लागली. यापुढे डाळीचे भाव कमी होतील, असा प्रशासनाचा दावा होता. परंतु सत्यस्थिती यापेक्षा उलट असून गावरान तूर डाळ १६० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाने चुप्पी साधली असून डाळीचे भाव कमी होणार असल्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)गतवर्षीच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तूंचे दर दुप्पटमागीलवर्षीच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहे. दिवाळीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना सामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली. शासनातर्फे महागाई आटोक्यात आणण्याबाबत दावे केले जात असताना लोकमत प्रतिनिधीने बाजारात जाऊन महागाईचा आढावा घेतला. दिवाळीच्या फराळापासून खास सणांसाठी केल्या जाणाऱ्या पक्वान्नांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती मागीलवर्षीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून आले.