शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
3
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
6
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
7
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
8
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
11
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
12
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
14
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
15
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
16
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
17
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
18
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
19
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
20
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती

५४ दिवसानंतरही विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत

By admin | Published: August 21, 2016 12:29 AM

विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढावी व त्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहेत.

सर्व शिक्षा अभियानाचा फज्जा : विद्यार्थी शैक्षणिक सुविधेपासून वंचित, पालकांमध्ये असंतोषविशाल रणदिवे अड्याळ विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढावी व त्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविल्या जाते. मात्र ५४ दिवसाच्या शैक्षणिक सत्रात अड्याळ येथील विद्यार्थी पुस्तकाच्या प्रतिक्षेत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे पालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविल्या जात आहे. यावर राज्य शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून वर्षाला कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तक वितरीत करावे, असे निर्बंध घातले आहे. यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती संस्थेकडून उन्हाळ्यातच शिक्षण विभागाला पुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळा सुरू होण्यापुर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून संबंधित पंचायत समिती व तिथून शाळांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.पुस्तके मिळाली असली तरी अनेक विषयांचे पुस्तके कमी प्रमाणात पाठविल्याने अनेकांना अद्यापही पुस्तकांचा पुर्ण संग्रह मिळालेला नाही. अनेक विद्यार्थी पुस्तकापासून वंचित असल्याने शैक्षणिक सत्र सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही त्यांना शाळेत अन्य विषयाचे अभ्यासक्रम हाताळावे लागत आहे. अनेक शाळांमध्ये पहिल्या सत्रातील चाचण्या सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांकडे पुस्तक उपलब्ध नसल्याने अनेकांची शैक्षणिक बोळवण होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. याबाबत शिक्षण विभागाला विचारणा केली असता त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला माहिती दिली असून त्यांच्याकडून वेळेत पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. शिवसेना तालुका प्रमुख राजु ब्राम्हणकर व ग्रामपंचायत सदस्य महेश गभने यांनी पुस्तकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षण विभागाने त्वरीत पुस्तकांचे वाटप करावे, अशी मागणी केली आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी बाजारपेठेत पुस्तकांची पाहणी केली मात्र तिथेही पुस्तक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरविली जातात. दरम्यान अड्याळ येथील सुजाता कन्या विद्यालय, अड्याळ विद्यालय अड्याळ, प्रकाश विद्यालय अड्याळ व विवेकानंद विद्या भवन विद्यालय अड्याळ या चार विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतिक्षेत आजही आहेत. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांना पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले. त्यांच्याकडून मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वळती करण्यात आली. मात्र पुस्तक कधी उपलब्ध होईल, याबाबत कुणीही बोलायला तयार नाही. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. मात्र ५४ दिवसांच्या कालावधीनंतरही पुस्तके अप्राप्त असल्याने यालाच सर्व शिक्षा अभियान म्हणायचे काय? असा संतप्त प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.आमच्याकडे जेवढी पुस्तके पुरविण्यात आली त्या सर्व पुस्तकांचा शाळांना पुरवठा करण्यात आला. अतिरिक्त पुस्तकांची मागणी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. -एन. टी. टिचकुले, गटशिक्षणाधिकारी पवनी.पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. परंतु पुस्तकच उपलब्ध झालेले नाही. पुस्तके प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येईल.-के. डी. भुरे, विस्तार अधिकारी, पवनी.शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पुस्तक मिळावी यासाठी वारंवार मागणी करण्यात आली आहे. पुस्तक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.-व्ही. एस. जगनाडे, मुख्याध्यापक विवेकानंद विद्यालय अड्याळ.