शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याईचा वावरात निंघते किस, दलालाईच्या घरी पडते पैशाईचा पाऊस : अंजनाबाई खुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 17:19 IST

लाखांदूर तालुक्यातील मुर्झा येथे आयोजित २८ व्या साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवसाच्या कविसंमेलनात ज्येष्ठ कवयित्री अंजनाबाई खुणे यांनी झाडीबोलीतील कविता सादर केल्या.

ठळक मुद्देमुर्झा येथील झाडीबोली साहित्य संमेलनात रंगली कवींची मैफल

भंडारा : 'शेतकऱ्याईचा वावरात निंघते किस, दलालाईच्या घरी पडते पैशाईचा पाऊस' या ओळी आहेत. झाडीबोलीची बहिणाबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री अंजनाबाई खुणे यांच्या शेतकरी व्यथा मांडणाऱ्या कवितेच्या. लाखांदूर तालुक्यातील मुर्झा येथे आयोजित २८ व्या साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवसाच्या 'रामचंद्र डोंगरवार मांडवात' आयोजित कविसंमेलनात अध्यक्षस्थानाहून त्या झाडीबोलीतील कविता सादर करत होत्या.

' कोलू पाटलानी बांध नवेगावी बांधला, पैसा खर्च करून गा सोता घाम काहाळला' ही दुसरी कविताही त्यांनी सादर करून रसिकांची दाद मिळविली. यावेळी व्यासपीठावर झाडीबोलीचे प्रवर्तक डाॅ. हरिश्चंद्र बोरकर, संमेलनाध्यक्ष डाॅ. संजयकुमार निंबेकर, ज्येष्ठ साहित्यिक हिरामन लांजे, लखनसिंह कटरे, ना. गो. थुटे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, डाॅ. हेमकृष्ण कापगते आदी उपस्थित होते. या सर्वांनीही कविता सादर करून संमेलनाची रंगत वाढविली.

कविसंमेलनात जवळपास ५० चे वर कवींनी सहभाग घेतला. यात संतकवी डोमा कापगते, सुभाष धकाते, पालिकचंद बिसने, लता पुस्तोडे, बालकवी हुपेश कापगते, भूषण कापगते, पांडुरंग नंदागवळी, टेकराम निंबार्ते, सुखदेव चौथाले, दिवाकर मोरस्कर, सु. वि. साठे, सपना बन्सोड, त्रंबक बन्सोड, पंडित लोंढे, लक्ष्मण खोब्रागडे, चंद्रकांत लेनगुरे, उपेंद्र रोहनकर, मुरलीधर खोटेले, लोकराम शेंडे, चुडीराम पाथोडे, तारका रूखमोडे, अरूण झगडकर, प्रेमेश्वर बारसागडे, संजीव बोरकर, सुशील खापर्डे, नरेश नवखरे, तुलाराम चोले, डाॅ. समीर गहाणे, सुनील सरपाते, समीर ठलाल आदी कवींनी विविध विषयांवरच्या मनोवेधक कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. कविसंमेलनाचे संचालन प्रा. अश्विन खांडेकर यांनी तर आभार प्रदर्शन खुशाल झोडे यांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिक