शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

विधानसभेच्या आटोपल्या; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केव्हा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 11:18 IST

पदाधिकाऱ्यांचा एकच सवाल : नगरसेवकांची भासू लागली उणीव

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या आहेत. आता जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे लक्ष स्थानिक स्वराज्य निवडणुकांकडे लागले आहे. सरकार सत्तेत आरूढ होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घोषित करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विशेषतः एकट्या भंडारा शहरातच पावणेतीन वर्षांपासून नगर परिषदेवर प्रशासक राज आहे. अन्य पालिकांबाबतही असेच चित्र आहे.

विधानसभेची निवडणूक पार पडली असून, सत्ताधारी 'महायुती'ला मोठे यश मिळाले आहे. दुसरीकड गत अडीच वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिकांमध्ये प्रशासक राज सुरू आहे. माजी नगरसेवक व निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांना या निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि त्यानंतर महायुती सरकारने कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. सध्याच्या परिस्थितीत ९५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

परिणामी, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. या रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्याबाबत दबाव वाढत असल्याने या निवडणुका घेण्याच्या हालचाली केव्हा सुरू होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने या निवडणुका तातडीने घेतल्या जातील, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. नगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपून जवळपास ३३ महिने उलटले आहेत, त्यामुळे पालिकेवर दीर्घ काळापासून प्रशासकीय कारभार सुरू आहे.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पालिकेतील थेट सहभाग संपुष्टात आला आहे. मात्र, नगरसेवकच नसतील तर आमची कामे कशी होणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यांची कामे होत नसल्याने नागरिक चिंतित असून, त्यांना आता नगरसेवकांची उणीव भासू लागल्याचे चारही नगरपालिका क्षेत्रात चित्र आहे. 

हवसे-नवसे गुडघ्याला बाशिंग बांधून जिल्ह्यातील चार नगरपालिकामध्ये प्रशासक राज आहे. यात सर्वाधिक चर्चेची निवडणूक ही भंडारा नगरपालिकेची ठरणार आहे. जवळपास दोन लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहराचा विस्तार दिवसंगणिक वाढत आहे. अशा स्थितीत निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेणाऱ्या हवसे- नवस्यांचीही कमी नाही. हे येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे.

पावणेतीन वर्षापासून प्रशासकराज तुमसर, साकोली, पवनी आणि भंडारा अशा चार नगरपालिका आहेत. या चारही पालिकेत प्रशासकराज असून, निवडणूक झालेली नाही. दुसरीकडे भंडारा शहर हद्दवाढीबाबतच्या निर्णयावर संभ्रमता कायम आहे. भंडाराव्यतिरिक्त पवनी, साकोली आणि तुमसर नगरपालिकेची हद्दवाढ होण्याची शक्यता कमी आहे.

विकासकामांकडे होतेय दुर्लक्षनगरपालिकांचा कारभार मुख्याधिकारी म्हणजे प्रशासकांच्या हाती आहे. सर्वच नगरपालिकांतून आता नगराध्यक्ष आणि नगरसेवक नसल्याने नागरिकांनीही अस्वच्छता, पाणीपुरवठा, गटारी, रस्ते याबाबतच्या तक्रारी करणे सोडून दिले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र आता अनेक जण सक्रिय होताना दिसत आहेत. निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. दरम्यान, अनेक इच्छुक सक्रिय झाले असून, त्यांनी या माध्यमातून आपली तयारीसुद्धा सुरू केल्याचे दिसत आहे.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदbhandara-acभंडारा