शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गाेसेचे बॅक वाॅटर शिरले धान शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

गाेसे धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सध्या या प्रकल्पात २४४.५०० मीटर पाणी पातळी आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्यापही संपादित न झालेल्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे धरणाची अधिकत्तम पाणी साठवण पातळी २४५.५०० मीटर आहे. केवळ एक मीटर पातळी गाठायला कमी आहे. असे असतानाच अनेक शेतात पाणी शिरले आहे. अधिकत्तम पातळीपर्यंत साठवणूक झाल्यास अनेक शेतकऱ्यांचे नुकसान हाेण्याची भीती आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गाेसे धरणाच्या पाणी पातळीत वाढ हाेताच अद्यापही संपादित न झालेल्या शेतशिवारात बॅक वाॅटर शिरुन हाताशी आलेले धान या पाण्यात बुडाले आहे. भंडारा आणि पवनी तालुक्यातील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रात पाणी शिरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.गाेसे धरण प्रकल्प विभागाने पाण्याच्या पातळीत वाढ केली आहे. सध्या या प्रकल्पात २४४.५०० मीटर पाणी पातळी आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रात पाणी शिरले असून अद्यापही संपादित न झालेल्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे धरणाची अधिकत्तम पाणी साठवण पातळी २४५.५०० मीटर आहे. केवळ एक मीटर पातळी गाठायला कमी आहे. असे असतानाच अनेक शेतात पाणी शिरले आहे. अधिकत्तम पातळीपर्यंत साठवणूक झाल्यास अनेक शेतकऱ्यांचे नुकसान हाेण्याची भीती आहे.गाेसे प्रकल्पासाठी संपादित न झालेल्या आणि बुडीत क्षेत्रालगत असलेल्या शेतजमीन संपादित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. गत पावसाळ्यापूर्वी या शेतजमिनीची माेजणी सुरु करण्यात आली हाेती, परंतु पावसाळ्यात शेतात भात पिकाची लागवड झाल्याने माेजणी करता आली नाही. आता गाेसे प्रकल्प विभागाने नवीन तारीख देऊन तत्काळ शेतजमिनीची माेजणी करावी अशी मागणी हाेत आहे.प्रकल्पाचे बॅक वाॅटर बेला, दवडीपार, काेरंभी, सालेबर्डी या व इतर भंडारा तालुक्यातील गावांसह पवनी तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवारात शिरले आहे. त्यात मदन माटे, याेकेश कुटे, मदन मिराशे, भगवान राखडे, लावाजी राखडे, रामकृष्ण वाट, विनाेद राखडे, शंकर मते, परमेश्वर मते, धनराज भाेयर, लक्ष्मण कुथे, भाऊराव राखडे आदींचा समावेश आहे. पाणी शेतात शिरल्याने तीन डीपी पाण्याखाली गेले आहेत. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन- बॅक वाॅटर शिरलेल्या शेताची तत्काळ पाहणी करुन शेतकऱ्यांना माेबदला द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष यशवंत साेनकुसरे, काेरभीचे उपसरपंच मनाेहर नागदेवे, दवडीपारचे रवी वाट, आकाश राखडे, संजय लांजेवार, राकेश तंबुलकर, सुनील राखडे, मनाेज दुबे, कुणाल राखडे, अमित हुमणे, सुमेध वासनिक आदी उपस्थित हाेते. यासाेबतच वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन तत्काळ वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प