शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सदोष नियोजनामुळे बॅकवॉटर शिरले शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गणना करीत गोसेखुर्द प्रकल्प बांधण्यात आले. आता प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात जलसाठा वाढविण्याचे कार्य सुरू आहे.  २४५.५०० मीटरवर पाणीपातळी वाढविण्यात येत आहे.

इंद्रपाल कटकवारलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाची पूर्णत्वाकडे वाटचाल होत असताना त्यात अंतर्भूत असलेल्या बाबींकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे आता उघड झाले आहे. गोसेच्या बॅकवॉटरचा फटका भंडारा शहराला बसत असून, सुरक्षा भिंतीच्या सदोष नियोजन असल्याचे समोर आले आहे. योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे.दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गणना करीत गोसेखुर्द प्रकल्प बांधण्यात आले. आता प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात जलसाठा वाढविण्याचे कार्य सुरू आहे. २४५.५०० मीटरवर पाणीपातळी वाढविण्यात येत आहे. त्या अंतर्गत भंडारा शहराला बॅकवॉटरचा फटका बसू नये म्हणून दीड दशकापूर्वी भंडारा शहराच्या सभोवताल सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते त्यावेळी सुरू झालेले बांधकाम सदोष नियोजनामुळे पूर्ण झाले नाही. आता १ नोव्हेंबर २०२१ पासून वैनगंगा नदीचा जलस्त्रोतात सातत्याने वाढत आहे.ठराविक मर्यादेपर्यंत पाण्याची पातळी वाढविण्यात येत असल्याने पूर्व मध्य भागातील वस्तीमध्ये पाणी शिरू लागले आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अंडरग्राउंड बोगद्यातून बॅकवॉटर ग्रामसेवक कॉलनी ते भंडारा-वरठीपर्यंतच्या शिवारात साचले जात आहे. एकीकडे काेट्यवधी रुपयांची उधळपट्टी करुन सुरक्षाभिंत बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर दुसरीकडे आता चक्क नागरिकांच्या जीवाशीच खेळ सुरु आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कोट्यवधीचा चुराडा- शहराच्या सभोवताल ते पिंडकेपारपर्यंत असा एकूण दहा किलोमीटर लांबीची सुरक्षा भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तेव्हा या प्रस्तावित बांधकामाची किंमत जवळपास ९० कोटींच्या घरात होते. या भिंतीचे बांधकाम दशकभारपेक्षा जास्त कालावधीपासून पूर्णतः थांबले आहे. खऱ्या अर्थाने  भिंतीचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. सदोष नियोजनामुळे बॅकवॉटर तर शहरात शिरलेत यासोबतच असंख्य समस्यांनाही तोंड द्यावे लागणार आहे. ९० कोटींचे बांधकाम आता २०० कोटींच्या वर पोहोचले असताना कोट्यवधींचा चुराडा करून उपयोग काय? असेही नागरिक बोलू लागले आहेत.  

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प