शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

Bhandara Fire; आरडाओरडा आणि दार ठाेठावण्यात गेली ४० मिनिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 12:44 IST

Bhandara Fire ९ जानेवारीच्या पहाटे केवळ आरडाओरडा आणि दार ठाेठावण्यात चाळीस मिनिटे गेली. आग लागल्यापासून दार उघडण्यापर्यंतचा चाळीस मिनिटांचा वेळच दहा निष्पाप जीवांचा बळी घेऊन गेला.

ठळक मुद्देनेमके काय घडले त्या पहाटे डाॅक्टर, कर्मचारी उपस्थित असते तर वाचले असते दहा जीव

इंद्रपाल कटकवार

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवाला आता १३ दिवस पूर्ण हाेत असून आतापर्यंत चिडीचूप असणारे या घटनेवर दबक्या आवाजात का हाेईना बाेलायला लागले. ९ जानेवारीच्या पहाटे केवळ आरडाओरडा आणि दार ठाेठावण्यात चाळीस मिनिटे गेली. आग लागल्यापासून दार उघडण्यापर्यंतचा चाळीस मिनिटांचा वेळच दहा निष्पाप जीवांचा बळी घेऊन गेला. या कक्षात डाॅक्टर आणि कर्मचारी उपस्थित असते तर ती निरागस चिमुकले आज आपल्या आईच्या कुशीत बागडत असती.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे भीषण अग्नितांडव झाले. दहा बालकांचा बळी गेला. सात बालकांना वाचविण्यात यश आले. नेमकी घटना कशी घडली यावर कुणी बाेलायलाच सुरुवातीला तयार नव्हते. आता १३ दिवसांनंतर रुग्णालयातील स्थिती सामान्य हाेत असून या विषयावर चकार शब्द न बाेलणारे आता दबक्या आवाजात बाेलू लागले आहेत. ही घटना घडली तेव्हा कक्षात कुणीही उपस्थित नव्हते. आग लागल्याचे कुणालातरी सर्वप्रथम माहीत झाले आणि त्यानंतर एकच गाेंधळ उडाला. हा गाेंधळ तब्बल चाळीस मिनिटे सुरू हाेता. कुणाला कळत नव्हते, दार ठाेठावणे आणि धावपळ एवढेच सुरू हाेते. घटनास्थळी हाहाकार उडाला हाेता. कर्तव्यावर असलेले कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असते तर कदाचित ही घटना टाळताही आली असती, असे आता बाेलले जात आहे. खुद्द जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही त्या रात्रीच्या घटनेची चर्चा सुरू आहे. नेमके काेण दाेषी यावरून चर्चा हाेत आहे. या ठिकाणी नियुक्त डाॅक्टर आण परिचारिका उपस्थित असत्या तर ही घटना टाळता आली असती, असे अनेकजण सांगत आहेत.

खाली-वर जाण्यात गेला वेळ

आंतरुग्ण इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर असलेल्या आयसीयू कक्षासमाेर एसएनसीयू कक्ष आहे. यामध्ये दाखल नवजात बालकांना दूध देण्याची वेळ ठरवून दिली असते. नेमके त्याचवेळी बाळाला दूध द्यावे लागते. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास माता आपल्या बालकांना स्तनपान करण्यासाठी गेल्या हाेत्या. हे त्यांचे शेवटचे स्तनपान ठरले. बाळांना दूध दिल्यानंतर सर्व माता प्रसूतीपश्चात वाॅर्डात झाेपी गेल्या हाेत्या. त्यानंतर आरडाओरडा आणि धूर पाहून या कक्षाकडे धाव धेतली. मातांसाेबत असलेले नातेवाईक तळमजल्यावरच हाेते. त्यांना वर येण्यास वेळ झाला. काहींनी त्यांना अडविल्याने बालकापर्यंत पाेहाेचता आले नाही. प्रचंड आरडाओरड हो असल्याने काय हाेत आहे हे कळायच्या आत या दहा बालकांनी जगाचा कायमचा निराेप घेतला.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आग