शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काेविडचा कचरा ठरताेय घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

इंद्रपाल कटकवार भंडारा : दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाल्याने अन्य ठिकाणी तत्काळ स्वरूपात काेविड सेंटर सुरू करण्यात आले ...

इंद्रपाल कटकवार

भंडारा : दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाल्याने अन्य ठिकाणी तत्काळ स्वरूपात काेविड सेंटर सुरू करण्यात आले हाेते. यापैकी शहरातील ऐतिहासिक शाळा असलेल्या लालबहादूर शास्त्री विद्यालयात काेविड सेंटर उभारण्यात आले. हळूहळू रुग्णसंख्या कमी हाेत गेली. परिणामी काेविड सेंटरही रिकामे झाले. मात्र, याठिकाणची स्वच्छता झाली नाही. आता हाच काेविडचा कचरा घातक ठरू पहात आहे. स्वच्छतेसाठी अजूनही जिल्हा आराेग्य विभागाची अनदेखी हाेत आहे. तर दुसरीकडे शाळा सुरू झाल्यास आम्ही काय करावे असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समितीसमाेर उभा राहिला आहे.

विश्वात काेराेना महामारीने सर्वांनाच सळाे की पळाे करून साेडले. राज्यात त्यातही भंडारा जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत हाेती. १४०० पेक्षा रुग्ण एकाच दिवशी आढळत असल्याने तमाम शासकीय व खासगी काेविड रुग्णालये हाऊसफूल झाली. काेराेना रुग्णांना क्वाॅरंटाईन ठेवण्यासाठी जागा शाेधण्यात आली. शाळा बंद असल्याने तर काही ठिकाणी सभागृहांचा आसरा घेण्यात आला. शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील ज्युनिअर सेक्सनमधील तब्बल १२ खाेल्यांमध्ये काेविड रुग्णांची साेय करण्यात आली. सुरुवातीला सर्व काही आलबेल चालले. हळूहळू रुग्णसंख्या कमी हाेत गेल्याने येथील रुग्णही घरी परतले. शेवटच्या वेळी चार ते पाच रुग्ण उपस्थित असताना या दिवशीपासूनच या परिसराची स्वच्छता ठप्प पडली. आताही खाेल्यांमध्ये गाद्या पडून असून धूळ साचली आहे. खाेल्यांबाहेर मास्क, कापसाचे बाेंडे व अन्य साहित्य पडले आहे. सध्या शाळा बंद आहे. मात्र, शाळा सुरु झाल्यास, अशा धाेकादायक परिसरात शाळांमध्ये पाल्य काेण पाठविणार असा सवाल उपस्थित हाेत आहे.

एकमेकांकडे बाेट

जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनंतर शाळेतील वर्गखाेल्या काेविड रुग्णांसाठी वापरण्यात आल्या. आराेग्य विभागाचे साहित्य याठिकाणी आणण्यात आले. मात्र, यावेळी स्वच्छतेची जबाबदारी कुणाची अशा प्रश्न उपस्थित राहिला. आधीच जिल्ह्यात अनेक शिक्षकांची काेविड काळात नियुक्ती करण्यात आली हाेती. त्यातच शिक्षकांनीच किंवा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ही स्वच्छता करावी काय? आराेग्य विभागाचे कर्तव्य काेणते? यासाठी एकमेकांकडे बाेट दाखविण्याचा प्रतापही येथे पहावयास मिळत आहे. खऱ्या अर्थाने आराेग्य विभागाने शाळा परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी घ्यायला हवी हाेती. मात्र तसे काही झाले नाही.

काेटबाॅक्स

सर्वांनाच आपल्या जीवाची भीती असते. मुख्याध्यापक म्हणून स्वच्छता संदर्भात आदेश द्यायला हरकत नाही. मात्र, येथे साधारण नव्हे तर काेविड सेंटर हाेते. या संदर्भात जिल्हा आराेग्य प्रशासनाने दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे.

- केशर बाेकडे

प्राचार्य शास्त्री विद्यालय भंडारा