शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
4
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
5
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
6
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
7
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
8
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
9
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
10
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
13
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
14
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
15
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
16
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
17
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
18
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

मनोकामना पूर्ण करणारे कोकिळा व्रत

By admin | Published: July 31, 2015 1:09 AM

आपला संसार सुखी, समाधानी, समृद्धी, प्रगती, शांतीचा व्हावा आणि कुटुंबातील सर्वांना आरोग्य, संतती, संपत्तीचा लाभ व्हावा,

भंडारा : आपला संसार सुखी, समाधानी, समृद्धी, प्रगती, शांतीचा व्हावा आणि कुटुंबातील सर्वांना आरोग्य, संतती, संपत्तीचा लाभ व्हावा, सर्व व्याधी व अरिष्ट नाहीसे व्हावे यासाठी स्त्रिया अनेक व्रतवैकल्य, अनुष्ठाने, दान, धार्मिक उपासना मनोभावे करतात. सुवासिनींसाठी अतिशय महत्वाचे, मांगल्याचे, प्रभावी मानले जाणारे कोकिळा व्रताचा योग यंदा आला आहे. १८ वर्षांनंतर येणारा हा व्रत ३० जुलैपासून सुरू होऊन महिनाभर केला जातो. ज्यावर्षी अधिक आषाढ येतो त्यावर्षी निज आषाढ पौर्णिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत हे व्रत केले जाते. यंदा गुरूवार चतुर्दशी म्हणजे ३० जुलै रोजी या व्रताची सुरुवात होऊन शनिवार, नारळी पौर्णिमेला म्हणजे १९ आॅगस्ट रोजी समापन होणार आहे. कोकिळेच्या रुपात असलेल्या पार्वतीचे या व्रतात पूजन केले जाते. वशिष्ठ ऋषींनी शत्रुघ्न पत्नी कीर्तीमाला हिला ही कथा सांगितली होती. काही महिला एक महिनाभर, काही तीन दिवस तर काही महिला एक दिवसाचे व्रत करतात.सुवासिनींनी पूर्ण श्रद्धेने व्रत काळात या व्रताची कथा ऐकून किंवा ओवीबद्ध महात्म्य ऐकून उद्यापनाला तीन किंवा सात सुवासिनींना ओटी प्रदान करावी. स्नान केल्यानंतर यथाशक्ती चांदीचे, सोन्याचे अथवा कागदावर आंब्याच्या झाडावर बसलेली कोकिळा काढावी व षोड्शोपचारपणे पूजा करावी. दिवसभर हवीशा अन्नात साळीचे तांदूळ, डाळ, मूग, वाटाणे, दुधभात, दही-तूप, सुरण, पांढरा मुळा, नारळ, फणस, केळ सेवन करावे तर रात्री उपवास सोडून शुद्धान्न घ्यावे, असे कळविण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने सर्वत्र दुष्काळी वातावरण असल्याने नागरिक हैराण आहेत. (प्रतिनिधी)