शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
3
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
4
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
5
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
6
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
7
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
8
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
9
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
10
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
11
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
12
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
13
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
14
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
15
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
16
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
17
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
18
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
19
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
20
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...

एकत्र येऊन गाव विकासाचा आराखडा तयार करा!

By admin | Published: January 24, 2017 12:31 AM

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने केली तर गावच सोडा, संपूर्ण देशच विकासाची वाट धरेल.

नाना पटोले यांचे आवाहन : लाखांदूर येथे हागणदारीमुक्त उत्सव सोहळा, ४२ गावांतील सरपंचांचा सत्कारलाखांदुर : केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने केली तर गावच सोडा, संपूर्ण देशच विकासाची वाट धरेल. राजकारण व पक्ष वाद गाव विकासाला अडचण ठरते, तेव्हा सर्वजण एकत्र येऊन गाव विकासाचा आराखडा तयार करा, आम्ही त्या शासन दरबारी मंजूर करवून घेऊ त्यानंतर सर्व गाव विकासाच्या योजना आपोआप आपल्या गावात लोटांगण घालतील, यातून संपूर्ण जिल्हा विकासाच्या दिशेने धावायला लागेल असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती लाखांदुरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त उत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यपालन अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, माधुरी हुकरे, शुद्धमता नंदागवळी, नेपाल रंगारी, सभापती मंगला बगमारे, उपसभापती वासुदेव तोंडरे, नगरसेवक विनोद ठाकरे, पं.स.सदस्य कुंडलिक पेलने, शिवाजी देशकर, गुलाब कापसे, राजेंद्र ठाकरे, नेहा बगमारे, कांता मेश्राम, सभापती अर्चना वैद्य, गटविकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर, गटविकास अधिकारी गिरीश धायगुडे, पी. टी. निर्वाण, ए. जी. हेडवू, बालविकास अधिकारी वैतागे, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. आमदार बाळा काशिवार म्हणाले, हागणदारीमुक्त गाव हे केवळ कागदावर किंवा शासनाकडून पुरस्कार घेऊन होत नाही, अधिकारी किंवा पदाधिकारी हागणदारीमुक्त गाव करू शकत नाही तर गावातील प्रत्येक व्यकी, प्रत्येक कुटुंबप्रमुखाने मनात संकल्प करून स्वत:चे गाव स्वच्छ व निरोगी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिल्हाधिकारी म्हणाले, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी केवळ शासनाच्या निधीतून शौचालय बांधणे एवढेच महत्त्वाचे नाही तर शौचालयाचा पुरेपूर वापर झाला पाहिजे, गावात स्वच्छता दिसली पाहिजे. याप्रसंगी ४२ गावातील सरपंच व सचिवांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला राहुल सपाटे यांनी स्वच्छ भारत अभियानावर आधारीत भजन कार्यक्रम पार पाडला, त्यानंतर असर फाऊंडेशन भंडारा च्या कलापथकाने स्वच्छतेवर पथनाट्य सादर केले, संचालन सुरेश लंजे यांनी, तर प्रास्ताविक डि.एम.देवरे यांनी करून, आभार मेळे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)