शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

जिल्हा उद्योग केंद्र्राचा कारभार 'आॅक्सिजन'वर

By admin | Published: August 15, 2016 12:14 AM

जिल्हा मुख्यालयी उद्योगांसाठी शासनाच्या विविध योजना, बेरोजगार युवकांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी, उद्योगांच्या नोंदणीसाठी शासनाने जिल्हा उद्योग केंद्र स्थापन केले आहे;...

५० टक्के पदे रिक्त : व्यवस्थापकांकडे गोंदिया जिल्ह्याचा प्रभारदेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्हा मुख्यालयी उद्योगांसाठी शासनाच्या विविध योजना, बेरोजगार युवकांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी, उद्योगांच्या नोंदणीसाठी शासनाने जिल्हा उद्योग केंद्र स्थापन केले आहे; मात्र सहा वर्षांपासून येथील ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला असून कारभार सध्या 'आॅक्सिजन'वर सुरू आहे. जिल्ह्याचे हे केंद्र राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या प्रशासकीय इमारतीत आहे. शासनाद्वारे उद्योगांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या योजनांचे संचलनही या केंद्राकडून होते. जिल्हा उद्योग केंद्रात शासनाने मंजूर केलेल्या पदांची संख्या १६ आहे. ज्यात एक महाव्यवस्थापक, दोन व्यवस्थापक, चार उद्योग निरीक्षक, एक शाखा प्रमुख, एक लघु टंकलेखक, एक टिप्पणी सहायक, दोन लिपिक- टंकलेखक, एक वाहनचालक आणि तीन शिपाई नी पहारेकरी, अशी पदे समाविष्ट आहेत. शासनाने प्रत्येक पदासाठी कामाची विभागणी करून दिली आहे. त्यानुसार केवळ विविध योजना जाहीर करून उद्योगांचे काम पूर्ण होणार नाही, तर त्यांची अंमलबजावणी करणारे अधिकारी असणे गरजेचे आहे. तथापि, मंजूर १६ पैकी ८ पदांवर कार्य करणाऱ्या व्यक्ती जिल्हा उद्योग केंद्रात आहेत. म्हणजे ५० टक्के पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे या केंद्राचे प्रमुख असलेल्या व्यवस्थापकांकडे गोंदियाचा अतिरिक्त कारभार आहे. जिल्हा उद्योग केंद्रात शासनाने मंजूर केलेल्या पदांची संख्या १६ आहे. यापैकी ८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये, व्यवस्थापक, शाखा प्रमुख, एक टिप्पणी सहायक, वाहनचालक यांची प्रत्येकी एक, उद्योग निरीक्षक आणि शिपाई नी पहारेकरी, यांची दोन पदे रिक्त आहेत. कामाचा व्याप, कर्मचारी वर्गाची कमतरता, अशा स्थितीत सध्या कार्यरत अधिकाऱ्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. कमीत कमी अडचणी याव्यात, हा जरी प्रयत्न उपलब्ध अधिकाऱ्यांचा असला तरी प्रत्यक्षात मात्र हे प्रभावीरीत्या पार पाडणे त्रासदायकच ठरत आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे उद्योजक व बेरोजगारांचा रोष मात्र संबंधित अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अशा या बिकट परिस्थितीत जिल्ह्याचे नुकसान होत आहे. त्यातून औद्योगिक कायापालट कितपत यशस्वी होतो, यावर प्रश्नचिन्ह आहे. उद्योजकांच्या कामांना अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनंतरही विलंब होत असेल, तर बाहेरून येणाऱ्या उद्योजकाला अडचणींचा सामना करावा लागेल. कामासाठी वाहन नाहीजिल्ह्यातील उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा उद्योग केंद्रात वाहनाची आवश्यकता आहे. शासनाने वाहनचालकाचे पदही मंजूर केले आहे. मात्र येथील कार्यालयासाठी वाहन आणि वाहनचालक नाही. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना उद्योगांच्या विकासासाठी कमालीचा अडथडा निर्माण होत आहे.उद्योगांच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी कार्यालयात मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. गत अनेक वर्षांपासून कार्यालयातील ८ रिक्त पदे आहेत. पदे भरतीसाठी वरिष्ठांकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. पद भरतीचा मुद्दा हा वरिष्ठांचा असल्यामुळे कार्यालयातील पद भरती कधी पुर्ण होईल, हे सांगणे कठिण आहे.मदन खडसे, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, भंडारा.