शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

करडी गणपती तलावाचे मॉडेल तलावात रूपांतर

By admin | Published: June 19, 2016 12:20 AM

उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट राहतो. ही परिस्थिती बदलली पाहिजे, यासाठी जि.प. लघु पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला.

जि.प. पाटबंधारे विभागाचा पुढाकार : कोरड्या तलावात पाण्याचा प्रचंड साठा, शेती, मासेमारीला प्रोत्साहनयुवराज गोमासे करडीउन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट राहतो. ही परिस्थिती बदलली पाहिजे, यासाठी जि.प. लघु पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला. मागील वर्षापासून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मॉडेल तलाव म्हणून जिल्ह्यातील तीन तलावांची निवड करण्यात येत आहे. करडीचे गणपती तलाव त्यापैकीच एक सन २०१५-१६ वर्षात सुमारे १७ लाखाच्या खोलीकरणानंतर आज तीनपटीने पाणी साठून तलाव तुडूंब भरलेला आहे. सन २०१६-१७ वर्षापूर्वी सुमारे १९.९० लाख खर्चून तलावाचे खोलीकरण करण्यात आल्याने तलावाची क्षमता १० पटीने वाढण्यास मदत होणार आहे.सन २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हा निधीतून जिल्ह्यातील साकोली, सिरसी, करडी गावातील तलावांची खोलीकरण कामांसाठी निवड करण्यात आली होती. करडी गणपती तलावाच्या विकासाला प्रारंभ झाला. सदर कामासाठी जिल्हा विकास निधीतून सुमारे १७ लाखचा निधी दिला गेला. यातून १५० मीटर लांब, १०० मीटर रूंद व २.५० मीटर रूंद जागेत तलावाचे खोलीकरण पोकलँडच्या सहायाने करण्यात आले. कामाचे कंत्राट लाखनी येथील पोहरकर यांना होते. तलावाच्या खोलीकरणाच्या मातीचा वापर गावातील, बाजारातील खड्डे बुजविण्याबरोबर शेतीच्या विकासासाठी करण्यात आला. झाडांना भरण टाकण्यासोबत दलदलीचे ठिकाणे भरण्यासाठी मोफत माती दिली गेली. एक किलोमीटरपर्यंत गावाच्या गरजेनुसार जमिनीच्या विकासासाठी तलावातील मातीचा मोठा हातभार लागला.सन २०१५-१७ मध्ये पुन्हा जिल्ह्यातील रोंघा, सितासावंगी तलावासोबत करडी गणपती तलावाचा अंतर्भाव जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आला. सिद्धी विनायक मंदिर मुंबईच्या ट्रस्टच्या सिएसआर निधीतून १७० मीटर लांब, ८० मीटर रूंद व २.५० मीटर खोल खोलीकरणासाठी १९.९० लाखाचा निधी मिळाला अन तलावाच्या उर्वरित कामाला जोमाने सुरूवात करण्यात आली. सदर कामाचे कंत्राट चुटे एजन्सी भंडारा यांना आहे. खोलीकरणामुळे पुन्हा १० पट पाण्याची पातळी वाढण्याचा मानस व्यक्त होत आहे. मॉडेल तलाव म्हणून विकास होण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता आर.एस. अभियंता संजय चाचीरे यांचे नियोजन सोबत प्रशासनाचा उपक्रम मोलाचा ठरण्याची प्रतिक्रिया गावकरी व शेतकरी वर्गात व्यक्त होत आहेत.मी स्वत: जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक मॉडेल याप्रमाणे दरवर्षी तीन तलाव तयार करण्याचा निर्धार केला होता. जलयुक्त शिवार योजनेमुळे त्याला मुर्त रूप देता आले. करडीचे गणपती तलाव त्यापैकी एक आहे. तलावाच्या खोलीकरणातून गावाच्या विकासोबतच शेतीचा समतोल विकास साधता आला. पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. लोकांत जाणीव जागृती होण्यास मदत होऊन आणखी तलाव विकसित करण्याचा मानस आहे. मासेमार बांधवांना, जनावरे व विहिरींना फायदा झाला. पुढील वर्षात आणखी दहापट पाणी वाढण्याची शक्यता आहे.-आर.एस. गुप्ता, उपविभागीय अभियंता जि.प. भंडारा.पाकण मातीमुळे जमिनीची नापिकी संपली. गावातील बाजाराचा व सार्वजनिक हिताच्या जागांचा विकास करता आला. शेतीला ओलीत व जनावरांना दिलासा मिळाला. भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली. ढिवरबांधवांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला. करडी जि.प. क्षेत्रातील ईतर गावातील तलावांचा असाच विकास करण्याचा विचार आहे.-नीलिमा ईलमे, जि.प. सदस्य करडी.