शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

कोरोनामुळे लग्नसमारंभातील बडेजावपणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:26 AM

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही वर-वधूंनी लग्न उरकून घेतले. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमध्ये लग्नसोहळ्यासाठी २५ वऱ्हाड्यांची ...

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही वर-वधूंनी लग्न उरकून घेतले. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमध्ये लग्नसोहळ्यासाठी २५ वऱ्हाड्यांची उपस्थिती आणि २ तास वेळ असे निर्बंध घातल्यामुळे काही वर-वधूंनी आपले नियोजित लग्न पुढे ढकलले आहे. मात्र, बहुतांश वर-वधू आलिया भोगासी असावे सादर या उक्तीप्रमाणे आता आपले मन मोडून लग्न उरकून घेत आहेत. लग्नसोहळ्यात बहुतांश आई-वडिलांकडून बडेजावपणाचे दर्शन घडते. समाजातील आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी वेळप्रसंगी कर्ज काढून लग्नसोहळ्यात पैशाची उधळपट्टी केली जाते. या खटाटोपात अनेक मध्यमवर्गीयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. मात्र, कोरोनामुळे या सर्व बडेजावपणाला ब्रेक लागला असून गरीब असो वा श्रीमंत सर्वांच्या मुला-मुलींचे लग्न अगदी साधेपणाने पार पडत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. अगदी कमी खर्चात लग्नसोहळा आटोपत असल्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय आई-वडिलांनी मात्र सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. कोरोनामुळे किमान लग्नसोहळ्यातील गरीब-़श्रीमंतांमधील दरी तरी नाहीशी झाली असून कोरोनाने सध्या सर्वांना एकाच पंक्तीत आणून बसविले आहे.

बॉक्स

कमी खर्चातील बचतीची कोरोनाने दिली शिकवण

लग्नसोहळ्यातील खर्चाच्या बचतीसाठी राज्यात सर्वत्र सामूहिक विवाह सोहळ्याची चळवळ जोमाने राबविण्यात येत होती. मात्र, कोरोनाने या सर्वांना फाटा देऊन वैयक्तिक लग्नसोहळाही कमी खर्चात पार पाडता येतो, अशी शिकवण दिली आहे. अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले. लग्नसमारंभावरील या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय, बँडपथक, कॅटरर्स, डेकोरेशन, सुगम संगीत पथक आदी अनेक व्यवसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.