शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2022 1:25 PM

गतवर्षीच्या गारपिटीची मिळाली एक हजार रुपये मदत

विरली (भंडारा) : गतवर्षी रब्बी हंगामात झालेल्या गारपिटीची तब्बल वर्षभराने नुकसानभरपाई मिळाली. मदतीच्या नावाखाली केवळ एक हजार रुपये बँक खात्यात जमा झाले. मोठे नुकसान होऊनही तुटपुंजी मदत पाहून शेतकऱ्याचा संताप अनावर झाला. त्याने गुरुवारी एक हजार रुपये लाखांदूर तहसील कार्यालयाच्या बँक खात्यात जमा करून शासनाला परत केले.

लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील जयपाल प्रकाश भांडारकर, असे या व्यथित शेतकऱ्याचे नाव आहे. ते लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील रहिवासी आहेत. त्यांची गट क्र. ६२/२ मध्ये ०.४० हेक्टर शेती आहे. गतवर्षी रब्बी हंगामात लाखांदूर तालुक्यात गारपीट झाली. शेकडो शेतकऱ्यांसह जयपाल यांच्या शेतातील पिकांचे गारपिटीने मोठे नुकसान झाले. शासनाने गारपीटग्रस्तांना मदत घोषित केली.

महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. मदतीच्या यादीत जयपाल यांचेही नाव होते. भरपाई मिळण्यास वर्ष उलटले. रक्कम खात्यात जमा झाली. किती? तर केवळ १ हजार रुपये. ही तुटपुंजी रक्कम पाहून भांडारकर उद्विग्न झाले. त्यांनी मिळालेली मदत शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला व लाखांदूर तहसील कार्यालय गाठून शासनाच्या बँक खात्यात एक हजार रुपये जमा केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

भांडारकर यांची ही भूमिका सध्या सध्या चर्चेचा विषय झाली आहे. भांंडारकरशिवाय अनेक शेतकऱ्यांना अशीच एक-दोन हजार रुपये भरपाई मिळाली आहे.

शेतात लावलेल्या ०.४० हेक्टरमधील हरभरा पिकाचे गारपिटीने पूर्णत: नुकसान झाले. लागवडीचा खर्चही निघाला नाही. पंचनामा कमी क्षेत्राचा दाखविल्याने तुटपुंजी रक्कम मदत म्हणून मिळाली. त्यामुळे मी ती परत केली.

- जयपाल प्रकाश भांडारकर

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीfloodपूरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारbhandara-acभंडाराEknath Shindeएकनाथ शिंदे