शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

आठवडा झाला तरी दोषी सापडेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 02:34 IST

भंडारा अग्निकांडाला शनिवारी आठ दिवस पूर्ण होत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनेदिवशीच भंडाऱ्यात येऊन उच्चस्तरीय समितीची घोषणा केली.

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाचे खरे कारण शोधण्यासाठी नियुक्त  केलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने आठवडा उलटल्यावरही आपला अहवाल सादर केलेला नाही. तो नेमका कधी सादर होणार, हे देखील स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे प्रशासनाला घटनेतील दोषी सापडेनासे झाले आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे. 

भंडारा अग्निकांडाला शनिवारी आठ दिवस पूर्ण होत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनेदिवशीच भंडाऱ्यात येऊन उच्चस्तरीय समितीची घोषणा केली. तीन दिवसात ही समिती अहवाल देईल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. समितीच्या अध्यक्षाची उचलबांगडी करून विभागीय आयुक्त संजीवकुमार यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तेव्हा दोन-तीन दिवसातच दोषींवर कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप या समितीचा अहवाल सादर झाला नाही. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी रविवारपर्यंत समिती अहवाल देईल, असे सांगितले. त्यामुळे सर्वांच्या नजरा अहवालाकडे लागल्या आहेत.  भंडारा पोलीस ठाण्यात तूर्तास दहा बालकांच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर पोलीस कारवाईची दिशा निश्चित होईल. अहवाल येत नाही तोपर्यंत ही घटना आणि घटनेला कोण जबाबदार आहे, हे कळायला मार्ग नाही.

समितीकडून प्रात्यक्षिकासह चौकशीn चौकशी समितीने १२ जानेवारी रोजी दिवसभर तळ ठोकून कसून चौकशी केली. अग्निशमन कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, गार्ड यांच्याकडून या घटनेचे प्रात्यक्षिक करवून घेतले. n या पथकात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रामास्वामी एम., महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसचे संचालक प्रभात रहांगडाले, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे तसेच आरोग्य सेवा उपसंचालक संजय जयस्वाल यांचा समावेश होता.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगCrime Newsगुन्हेगारी