शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

पवनीतील पर्यटन संकुलाची दैनावस्था

By admin | Published: November 17, 2015 12:40 AM

तालुक्यातील पर्यटन स्थळ व भेटी देणारे पर्यटक यांचा विचार करुन शासनाने निसर्गरम्य बालसमुद्र तलावाच्या काठावर पर्यटन संकुल मंजूर केले.

शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष : कोट्यवधी रुपयांची वास्तू ठरत आहे ‘शो-पीस’, पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर अशोक पारधी पवनी तालुक्यातील पर्यटन स्थळ व भेटी देणारे पर्यटक यांचा विचार करुन शासनाने निसर्गरम्य बालसमुद्र तलावाच्या काठावर पर्यटन संकुल मंजूर केले. पर्यटन संकूलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले. कंत्राटदाराला कामाचे देयक न मिळाल्यामुळे किरकोळ काम रखडले आहेत. त्यामुळे हस्तांतरणाची प्रक्रीया रखडली आहे. सध्या बांधकाम झालेल्या पर्यटन संकूलाची दैनावस्था सुरु झाली आहे.प्राचीन व ऐतिहासीक वारसा असलेले पवनी नगर विदर्भाची काशी म्हणून संबोधल्या जाते. व्यापारासाठी भूतकाळात प्रसिध्द असलेल्या नगराचे संरक्षणासाठी मानवनिर्मित इंग्रजी 'यु' आकाराची संरक्षण भिंत व जवाहर गेटपासून काही अंतरापर्यंत भिंतीवर बांधलेली तटबंदी, परकोट (किल्ला), विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असेलेले पंचानन गणेश (सर्वतोभद्र) किंवा पंचमुखी गणेश, धरणीधर गणेश मंदिर, वैजेश्वर देवस्थान, मुरलीधर मंदिर, गधादेव, जगन्नाथ मंदीर, दिवाणघाट, वैजेश्वर घाट, पुरातत्व विभागाने उत्खनन करुन शोभलेले मंडप, बुध्द स्तुप व त्याचे अवशेष, चंडीका मंदिर, विठ्ठल रुखमाई मंदिर, दत्त मंदिर, राम मंदिर, देम्बेस्वामी साधना मंदिर व शिल्पकतेचा उत्तम नमुना असलेले गरुड खांब तसेच गोसीखुर्द धरण, कऱ्हांडला पवनी अभयारण्य, रुयाळ येथील महासमाधीभूमी परिसर, कोरंभी डोंगरावरील महादेव मंदिर, ठाणा येथील निसर्गरम्य चंडीकामंदिर व अभयाण्यामुळे प्रवेशास बंदी असलेले ढिवरढुटी असे अनेक पर्यटक स्थळ पवनी तालुक्यात आहे.ही सर्व स्थळे एका दिवसात पाहणे शक्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यटन मंत्रालयाने पवनी येथे ७ वर्षांपूर्वी पर्यटन संकूल प्रस्तावित करुन बांधकाम सुरु केले. थाटात भुमिपूजन झाले. अल्पावधीत बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन तत्कालीन मंत्र्यानी दिले. पंरतु लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही, अशी म्हण आहे. अगदी तसेच पर्यटन संकुलाचे बाबतीत झाले.कोट्यवधीचे हे पर्यटन संकूल बांधून तयार आहे. पर्यटकाना रमवेल असे स्थळ निवडण्यात आले. परंतु शासनाचे दुर्लक्षामुळे कोट्यवधी रुपये खर्च झालेली इमारत धुळखात पडलेली आहे. छतावर स्लॅप ऐवजी टीनपत्रे वापरली असल्याने ती उडू लागली आहेत. पावसाचे पाणी गळून सिलिंगचे पिओपी गळून पडत आहे.झालेली रंगरंगोटी खराब होत आहे. पर्यटन विभाग या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने पर्यटकात नाराजीचा सूर आहे. पर्यटन संकूल पर्यटकांच्या सेवेसाठी लवकर सुरु करावे, अशी मागणी जोर धरत आहे.