शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गोसेखुर्द प्रकल्पातून दहा दिवसात ११४० दलघमी पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

गतवर्षी महापुराला कारणीभूत ठरलेल्या या प्रकल्पाचे पाणी यंदा नियंत्रितपद्धतीने सोडण्यात येत आहे. २३ जुलै रोजी सर्वप्रथम या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. तेव्हापासून दरारोज या प्रकल्पाचे दरवाजे कमी जास्त संख्येत उघडण्यात येत आहे. २ ऑगस्ट रोजी या प्रकल्पाचे ११ दरवाजे ११ मीटरने उघडण्यात आले होते. त्यातून ११९२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यासोबतच डाव्या कालव्यातूनही पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

ठळक मुद्देजलस्तर नियंत्रणासाठी उपाय : प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पाचा जलस्तर कायम ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गत दहा दिवसात प्रकल्पाचे दरवाजे उघडून ११४० दलघमी पाणी सोडण्यात आले. वैनगंगा नदी आणि गोसेखुर्द प्रकल्पाचा जलस्तर पावसाळ्यात वाढत आहे. गतवर्षी महापुराला कारणीभूत ठरलेल्या या प्रकल्पाचे पाणी यंदा नियंत्रितपद्धतीने सोडण्यात येत आहे. २३ जुलै रोजी सर्वप्रथम या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. तेव्हापासून दरारोज या प्रकल्पाचे दरवाजे कमी जास्त संख्येत उघडण्यात येत आहे. २ ऑगस्ट रोजी या प्रकल्पाचे ११ दरवाजे ११ मीटरने उघडण्यात आले होते. त्यातून ११९२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यासोबतच डाव्या कालव्यातूनही पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दहा दिवसात तब्बल ११४० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. भंडारा-नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दोन लाख ५० हजार ८०० हेक्टर जमीन सिंचनाची क्षमता या प्रकल्पाची आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पातील जलसाठा २४३.११ मीटर असून पाण्याची टक्केवारी ४०.५९ टक्के आहे. गोसे गावाजवळ बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाची लांबी ११.३५ किमी असून उंची २२.५ मीटर आहे. पाणी साठवण क्षमता ११४६ दलघमी आहे. सद्यस्थितीत ३०३ दलघमी पाणीसाठा असतानाही पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून या प्रकल्पाचे पाणी नियंत्रित केले जात आहे.

पुनर्वसनाचा प्रश्न कायम- गोसे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या काही गावांचे पुनर्वसन अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे हा प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरला जात नाही. त्यामुळेच या प्रकल्पात ४० टक्के पेक्षा अधिक पाणी संग्रहीत केले जात नाही. गोसेप्रकल्पाचे पाणी सोडल्यानंतर वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.कारधा येथे वैनगंगा पातळी इशारा पातळीपेक्षा कमी- भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची सोमवारी २४३.१२ मीटर पातळी मोजण्यात आली होती. येथे इशारा पातळी २४५ मीटर आणि धोका पातळी २४५.५० मीटर आहे. सद्यस्थितीत इशारा पातळीपेक्षा कमी पाणी आहे. मात्र लहान पुलाच्या मोऱ्या वैनगंगा दुथडी असल्याने बुजल्या आहेत. प्रशासनाने पुलावरील सुरक्षा कठडे काठले असून नागरिकांनी सावध रहावे, अशा सूचना दिल्या आहे.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प