शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकअदालतीमध्ये कामगारांच्या प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

कामगार न्यायालयाचे न्या. रोहिणी भोसले नरसाळे यांच्या मदतीने याप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यास संदर्भातले प्रकरण असताना लोकअदालतमध्ये फक्त दोन तासांच्या प्रयत्नांनंतर मध्यस्थीने प्रकरणात समेट घडवून आणण्यात आले. लोकअदालतमध्ये प्रथमच मध्यस्थी प्रक्रियेचा वापर करण्यात आला. या बाबीला यशही लाभले.  पॅनल सदस्य म्हणून ॲड. दिवान निर्वाण, नत्थुजी खंडाईत यांनी प्रकरण समेटसाठी सहकार्य केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील औद्योगिक व कामगार न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये नऊ प्रकरणे आपसी समजुतीने निकाली काढण्यात आले. औद्योगिक न्यायालयाचे न्या. अतुल के. शाह यांनी अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या प्रकरणात हा वाद सामंजस्याने सोडविण्यासाठी मध्यस्तीचा वापर करीत प्रकरण मार्गी काढले. कामगार न्यायालयाचे न्या. रोहिणी भोसले नरसाळे यांच्या मदतीने याप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यास संदर्भातले प्रकरण असताना लोकअदालतमध्ये फक्त दोन तासांच्या प्रयत्नांनंतर मध्यस्थीने प्रकरणात समेट घडवून आणण्यात आले. लोकअदालतमध्ये प्रथमच मध्यस्थी प्रक्रियेचा वापर करण्यात आला. या बाबीला यशही लाभले.  पॅनल सदस्य म्हणून ॲड. दिवान निर्वाण, नत्थुजी खंडाईत यांनी प्रकरण समेटसाठी सहकार्य केले. या प्रकरणात न्या. रोहिणी भोसले यांनी गैरअर्जदारविरुद्ध समन्स काढल्यामुळे आदेशाची गंभीरता कळली. अवघ्या २४ तासांत मजुरांच्या थकबाकीची रक्कम मंजूर करून घेऊन ती न्यायालयामार्फत तिन्ही पक्षकारांना प्रदान करण्यात आले. लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी औद्योगिक व कामगार न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही न्यायालयांचे न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले. याशिवाय प्रकाश चांदेकर, अविनाश देशमुख, मनोज बावनकर, भेंडारकर, प्रिया पाली, जाणे यांनी सहकार्य केले. पक्षकारांचे अधिवक्ता म्हणून ॲड. विजय दलाल, ॲड. विनय भोयर, ॲड. निचकवडे, ॲड. ऋषिकेश गुप्ते, ॲड. सचिन राघोर्ते, ॲड. शिशिर वंजारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांचेही लोकअदालतीमध्ये सहकार्य लाभले. लोकअदालतीमुळे नागरिकांची प्रकरणे तातडीने निकाली निघण्यास मदत होत आहे.

सहा वर्ष प्रलंबित प्रकरणे निकाली- तीन कामगारांचे सहा वर्षांपासूनचे प्रकरणे प्रलंबित होते. तेही आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आले. यात इस्तारी भोयर, शेषराव भोंदे आणि रामभाऊ मते यांचे डिसेंबर २०१४ पासूनचे मजुरीची रक्कम थकबाकी होती. फळ रोपवाटिका विभाग आधार विभागाद्वारे उशिरा का होईना? या तिन्ही प्रकरणात १५ लाख ९० हजार रकमेचे प्रकरण निकाली निघाले.

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत