शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

जिल्हा कचेरीच्या व्हरांड्यात तरुण शेतकऱ्याला मारहाण

By admin | Published: September 23, 2015 12:41 AM

शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादाची सुनावणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असताना एका शेतकऱ्याच्या मुलाला चार इसमांनी जबर मारहाण केली.

शेतीचा वाद : चौघांविरूध्द पोलिसात तक्रार दाखलभंडारा : शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादाची सुनावणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असताना एका शेतकऱ्याच्या मुलाला चार इसमांनी जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यात घडली. या घटनेमुळे कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.जितेंद्र हरिचंद्र येंचेलवार (२८) रा.कुरूडा ता. मोहाडी असे जखमी शेतकरी पुत्राचे नाव आहे. घटनेदरम्यान सदर प्रतिनिधीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठताच हरिचंद्र येंचेलवार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, गावालगतची एक शेती खरेदी केली होती. मात्र, त्या शेतीवर जाण्यासाठी शेता बाजुच्या शेतकऱ्यासोबत वाद झाला होता. या वादाची दाद मोहाडी तहसीलदारांकडे मागण्यात आली. तेथून हे प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग करण्यात आले होते. याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी सुनिल पडोळे यांच्या दालनात आज मंगळवारला दोन्ही शेतकऱ्यांना तारखेवर बोलाविण्यात आले होते. यासाठी हरिचंद्र येंचेलवार हे मुलगा जितेंद्रसह उपस्थित झाले होते. पडोळे यांच्या दालनात दोन्ही शेतकऱ्यांना पुढील तारीख देण्यात आली. त्यानंतर हरिचंद्र हे मुलासह बाहेर आले असता सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले धनराज कवडू चिंतनवार, शंकर कवडू चिंतनवार, ग्यानीराम राजेराम लकडेस्वार व भैय्या परसराव ठवकर यांनी दालनाबाहेर जितेंद्रला गाठून वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने या चौघांनीही जितेंद्रला तिथेच बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीमुळे जितेंद्रने जिवाच्या आकांताने आरडाओरड केली. सोबत असलेले जितेंद्रचे वडील मुलाच्या मदतीला धावून आले. मात्र, चौघांनीही त्यांना धक्काबुक्की करून बाजुला सारले. मारहाण सुरू असल्यामुळे जितेंद्रला त्या चौघांच्या तावडीतून सोडविण्याची हिम्मत उपस्थित एकानेही दाखविली नाही. हा आवाज ऐकून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धावून आले. तोपर्यंत चौघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती होताच भंडाराचे पोलीस जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. दरम्यान, अर्धा तासपर्यंत जितेंद्र घटनास्थळी विव्हळत पडून होता. त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी हरिचंद्र येंचेलवार यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी त्या चौघांविरुद्धही गुन्हा नोंदविला आहे. (शहर प्रतिनिधी)अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हजिल्हाधिकारी कार्यालयातील अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर चौघांनी जितेंद्र येंचेलवार या शेतकरी पुत्राला बेदम मारहाण केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस उपस्थित होते. मारहाणीचा प्रकार घडून चौघेही पळून गेले. परंतु तेथील सुरक्षारक्षकांनी एकालाही अटकाव केला नाही. त्यामुळे भविष्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनाही बाहेर कुण्या व्यक्तीने मारहाण करण्याचा प्रसंग ओढवला तर हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या प्रकरामुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.