शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

मासिक पाळी लांबविण्यासाठी गोळ्या घेता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 16:54 IST

महिलांनो, काळजी घ्या : अन्यथा हार्मोन्सवर होऊ शकतो परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिला खूप वेळा पुढे ढकलण्यासाठी किंवा मासिक पाळी थांबविण्यासाठी गोळ्या घेतात. मात्र, असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा गोळ्या घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सीमा तुरस्कर यांनी दिला आहे.

महिलांमध्ये मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिन्यातून एकदा ती प्रक्रिया महिलांच्या शरीरात होत असते; पण याला धार्मिक बाबींशी जोडल्याने किंवा इतर कारणांनी अनेकदा महिलांना मासिक पाळी उशिरा यावी असे वाटते. धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा इतर बाबींमुळे काही महिला मासिक पाळी लांबविण्यासाठी हार्मोनल गोळ्या घेतात; पण या गोळ्या खाण्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या नकोचकोणतीही आरोग्याची समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ नयेत. बरेचदा सल्ल्याविना गोळ्या घेतल्यास त्याचे शरीरावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे असा प्रकार टाळावा.

मासिक पाळीच्या चक्रावर होणारे परिणाम

शरीरावर रिऍक्शन कोणतीही आरोग्याची समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ नयेत. बरेचदा विनासल्ल्याने गोळ्या घेतल्यास त्याचे शरीरावर रिअॅक्शन होऊ शकते.

प्रजननासंबंधित समस्याःअशा गोळ्यांमुळे मासिक पाळी अनियमित होऊन प्रजननासंबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा गोळ्या घेतल्याने मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो.

गर्भाशयातील समस्यावारंवार गोळ्या घेतल्यास गर्भाशयासंदर्भातील समस्या उद्भवू शकतात. ओटीपोटात प्रचंड वेदना होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या वारंवार घेऊ नये.ऐका... स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला

सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊच नका"अनेक महिला आपल्या मर्जीनुसार मासिक पाळीची तारीख मागे-पुढे करण्यासाठी गोळ्यांचा वापर करताना दिसून येतात. अशा गोळ्यांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्लाही घेत नाहीत. मात्र, अशा प्रकारामुळे हार्मोन्सवर परिणाम होण्याची शक्यता असते. दीर्घकाळ अशा गोळ्यांचे सेवन केल्यास मासिक पाळीमध्ये अनियमितता येऊन ती बंद होण्याचे, तसेच प्रजननासंबंधित समस्या उद्भवण्याचा धोका असतो."

- डॉ. सीमा तुरस्कर, स्त्रीरोगतज्ज्ञ, भंडारा. 

टॅग्स :Menstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यwomens healthस्त्रियांचे आरोग्यbhandara-acभंडारा