शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जलपर्यटनाच्या उद्घानादरम्यान पत्रकारांची बोट बुडताना बचावली

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: June 24, 2024 20:34 IST

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान मोठी दुर्घटना टळली

भंडारा : येथील कारधा पुलालगतच्या वैनगंगा नदीच्या पात्रात सोमवारी मोठा दुर्घटना टळली. जलपर्यटनाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचे बोटींग करतानाचे फोटो घेण्यासाठी लागलेल्या चढाओढीत पत्रकार व छायाचित्रकार असलेली बोट एका बाजुला कलली. त्यामुळे सोफा पाण्यात पडला. बोटीत पाणी शिरले. प्रसंगावधान राखून बोटीचे चालक गोविंद खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना व्यवस्थित बसविले, पर्यायाने बोट बुडताना बचावली आणि मोठी दुर्घटना टळली.

भंडारा जिल्हा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोसेखुर्द जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. त्या कार्यक्रमादरम्यान जल पर्यटनाची प्रात्यक्षिके झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी जलसफर करण्याची इच्छा व्यक्त केली. नाशिक बोट क्लब येथील दोन बोटी आणल्या होत्या. त्यातील एका बोटीमध्ये मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह आठ जण होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार दुसऱ्या बोटी मध्ये पत्रकारांना घेतले. या बोटीचे वाहक हे गोविंद खवणेकर होते. बोट सफर करताना मुख्यमंत्र्यांनी प्रतिकात्मक म्हणून स्वतः बोट चालवण्याची इच्छा व्यक्त केली. बोट हे चालवतानाचे क्षण टिपण्यासाठी दुसऱ्या बोटीतील सर्व पत्रकार एकदम बोटीच्या पुढील भागात आले. बोट चालकाने एका बाजूला न जाण्याची आणि बसण्याची वारंवार विनंती केली.

परंतु त्याकडे दुर्लक्ष करून सर्वजण एकाच बाजुला आल्याने वजनाने बोट पुढील एका बाजूस झुकली. त्यामुळे बोटीचा पुढचा भाग पाण्यात गेला. पाण्याच्या दबावाने बोटीतील बसण्याचा भाग ओढला गेला व सोफासेट पाण्यात पडला. बोटीत पाणी शिरले. प्रसंगावधान राखून बोट चालकांनी सर्व पत्रकारांना व्यवस्थित बोटीमध्ये बसवले. हा अपघात घडत असल्याचे लक्षात येताच सुरक्षेसाठी काठावर तैनात असलेले जेटस्कि आणि रेस्क्यू टीमने पाण्यात उड्या घेऊ बोटीपर्यंत पोहचले. त्यानंतर सर्व पत्रकारांना सुरक्षितपणे काठावर आणण्यात आले.

प्रशासन म्हणते, बोटीला नुकसान नाहीया घटनेबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करताना बोटीला अथवा पत्रकारांना कोणतही नुकसान नसल्याचे, कुणीही पाण्यात पडले नसल्याने प्रशासनाने कळविले आहे. घटनेनंतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे एमटीडीसीचे महाव्यवस्थापक तथा मुख्य प्रशिक्षक डॉ.सारंग कुलकर्णी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी कळवले आहे.क्षमतेपेक्षा अधिक पत्रकार बसले बोटीतया बोटीची क्षमता ८ व्यक्तींची आहे. मात्र क्षमतेकडे दुर्लक्ष करून १४ ते १५ पत्रकार त्यात स्वार झाले. बोट अगदी नदीच्या मध्यभागापर्यंत गेली होती. या दरम्यान सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यानेच ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा