शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आठवडाभरात गाेसे प्रकल्पात हाेणार २४५.५० मीटर जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

पवनी तालुक्यातील गाेसे खुर्द येथे राष्ट्रीय प्रकल्प असून या प्रकल्पाचे जवळपास पूर्ण काम झाले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या नियाेजित जलसाठ्यात पुनर्वसनाअभावी वाढ करता येत नव्हती. परंतु आता कागदाेपत्री पुनर्वसन पूर्ण झाल्याने १ नाेव्हेंबरपासून या प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. टप्प्याने पाणी वाढवत १५ डिसेंबरपर्यंत २४५.५० मीटरपर्यंत जलसाठा करण्याचे निर्धारित हाेते. मात्र, १६ डिसेंबरपर्यंत या प्रकल्पात २४५.१३० मीटर जलसाठा झाला हाेता.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गाेसे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दीड महिन्यात २४५.१३० मीटर जलसाठा झाला असून आठवडाभरात पूर्ण क्षमतेने २४५.५० मीटर जलसाठा करण्याचे नियाेजन आहे. प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ हाेत असल्याने बॅक वाॅटरची समस्या निर्माण झाली असून अनेक शेतशिवारात पाणी शिरले असून रस्तेही पाण्याखाली आले आहेत. भूसंपादनाव्यतिरिक्त कुठपर्यंत पाणी जाणार याची खात्री प्रशासन या माध्यमातून करीत आहे.पवनी तालुक्यातील गाेसे खुर्द येथे राष्ट्रीय प्रकल्प असून या प्रकल्पाचे जवळपास पूर्ण काम झाले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या नियाेजित जलसाठ्यात पुनर्वसनाअभावी वाढ करता येत नव्हती. परंतु आता कागदाेपत्री पुनर्वसन पूर्ण झाल्याने १ नाेव्हेंबरपासून या प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. टप्प्याने पाणी वाढवत १५ डिसेंबरपर्यंत २४५.५० मीटरपर्यंत जलसाठा करण्याचे निर्धारित हाेते. मात्र, १६ डिसेंबरपर्यंत या प्रकल्पात २४५.१३० मीटर जलसाठा झाला हाेता. आता साधारणत: २२ डिसेंबरपर्यंत या प्रकल्पाचा जलसाठा २४५.५० मीटर हाेण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेताच बॅक वाॅटरमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली. भंडारा शहरासह तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवारात पाणी शिरले. रस्ते पाण्याखाली आले. भंडारा शहरातील ग्रामसेवक काॅलनीपर्यंत बॅक वाॅटर आले आहे. वैनगंगेच्या जलसाठ्यातही माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अथांग पाणी पात्रात दिसत असून वैनगंगेचा कारधा येथील लहान पूल पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. गुरुवारी कारधा येथे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी २४५.०७ मीटर नाेंदविण्यात आली. कारधा येथील जुन्या पुलावरुन वाहतूकही बंद करण्यात आली. २४५.५० मीटर जलसाठा झाल्यास विविध समस्याही निर्माण हाेण्याची शक्यता आहे.

बॅक वाॅटरचे सर्वेक्षण करणार गाेसे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ केल्यानंतर २४५.५० मीटर जलसाठा झाल्यावर बॅक वाॅटर कुठपर्यंत जाते, याचे सर्वेक्षण गाेसे पुर्नवसन विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. भूसंपादन झालेल्या व्यतिरिक्त कुठपर्यंत पाणी जाणार याचीही खात्री या निमित्ताने केली जाणार आहे. या बॅकवाॅटरच्या काेणत्या भागाला धाेका आहे याची माहिती घेतली जाईल. याबाबतचा अहवाल जलसंपदा विभागाला साेपविला जाणार आहे.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प