शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

प्रत्येक तालुक्यात होणार जनता दरबार

By admin | Published: February 06, 2017 12:21 AM

सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेण्यात येणार असून ...

पत्रपरिषदेत नाना पटोलेंची माहिती : भेलबाबत व्यवस्थापकीय संचालकांना पत्र भंडारा : सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेण्यात येणार असून यात जिल्हा व तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती खा.नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिल मेंढे, नगरसेवक नितीन धकाते उपस्थित होते. खा. पटोले म्हणाले, दोन्ही जिल्ह्यातील सामान्य जनता व शेतकरी यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु त्यांना त्यांचा लाभ घेता येत नाही. यासाठी त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा, त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवरच सोडविता याव्या, यासाठी हा जनता दरबार घेण्यात येणार आहे. यात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यात सर्वांचे प्रश्न सोडविण्यात येतील, डीआरडीएच्या धर्तीवर ‘दिशा’ योजनेअंतर्गत हे जनता दरबार घेण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.केंद्र शासनाच्या आर्थिक बजेट बाबतीत बोलताना ते म्हणाले, हा ऐतिहासिक बजेट आहे. यात रेल्वेचा अर्थसंकल्पाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला. पूर्वी देशातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी १ लाख कोटी रुपये मंजूर करण्यात येत होते. आता त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ते १० लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. यावरून बजेटचा केंद्रबिंदू हा शेतकरी असल्याचेच दिसून येते. शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पतपुरवठा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनाही किमान वेतन मिळायला पाहिजे, ही मागणी आहे. शेतीवर आधारीत उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे. छोटे उद्योगकांनीही बजेटमध्ये दिलासा मिळाला आहे. रेल्वेच्या विकासासाठी नागपूर विभागाला पहिल्यांदाच १५०० कोटी रुपये मिळाले. यात नागपूर विभागातील रेल्वेचा कायापालट करण्यात येणार आहे.केंद्रीय मंत्रीमंडळाची परवानगी नसताना सुरु करण्यात आलेल्या भेल प्रकल्पाबाबतीत बोलताना खा.नाना पटोले पुढे म्हणाले, पूर्वी भेल प्रकल्प हा २५० मेगावॅटचा राहणार होता. आता तो १ हजार मेगावॅटचा करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून तसे भेलचे व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठविण्यात आले असल्याची माहितीही खा.पटोले यांनी दिली.गोसेखुर्द प्रकल्पाचे टेंडर निघाले असून केंद्र सरकारच्या कंपनीच्या वतीने सर्व कार्य करण्यात येणार आहे. २०१९ पर्यंत गोसेचे ८० टक्के काम पूर्ण होणार आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत नागनदीचे पाणी वैनगंगा नदीत पडणे थांबणार आहे. यानंतर वैनगंगेच्या काठावरील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल. (जिल्हा प्रतिनिधी)