शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

लोकशाहीचे मूल्य सर्वांनी जपणे गरजेचे

By admin | Published: January 28, 2017 12:35 AM

राष्ट्रीय एकात्मता ही आपल्या देशाची ओळख असून विविधतेत एकता जपणारा देश म्हणून जगात भारताचा लौकिक आहे.

जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी : पोलीस कवायत मैदानावर मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम भंडारा : राष्ट्रीय एकात्मता ही आपल्या देशाची ओळख असून विविधतेत एकता जपणारा देश म्हणून जगात भारताचा लौकिक आहे. लोकशाही मुल्याची जपणूक व बळकटीकरणाची चळवळ या निमित्ताने उभी राहिली आहे. लोकशाहीचे हे मुल्य आपण सर्वांनी जपावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, विजया बनकर, विजय उरकुडे, जी. जी. जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य असून लोकांच्या कल्याणाच्या विविध योजना राज्य शासन राबवित आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून राज्यात शेतकरी, सामान्य नागरिक, महिला, तरुण व तरुणी यांना विकासाच्या प्रवाहात आणणाचा शासनाचा मानस आहे. या योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभागाची आवश्यकता असते.जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने रोख रहित व्यवहारावर आधारित चित्ररथ संचलनात सहभागी करण्यात आला होता, यासोबत कृषि, मतदार दिवस, पशुसंवर्धन व पाणी व स्वच्छता विभागाचे चित्ररथ संचलनात सहभागी होते. यावेळी पोलीस दलाच्यावतीने ध्वज संचलन करण्यात आले. यावेळी ध्वजदिन निधी संकलनामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी पुरस्कार स्वीकारला. स्काऊट गाईड क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद हायस्कुल वरठी, नवभारत हायस्कुल कोथुर्णा, पवन विद्यालय पवनी, जिल्हा परिषद हायस्कुल मोहाडी यांचा सत्कार करण्यात आला. राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा मध्ये खो-खो मध्ये महिला खेळाडू यांनी तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल पोलीस शिपाई योगिनी घोलर, वनिता कोडापे, माधूरी चामट यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नुतन कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. संचालन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)