शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

चिमण्यांचे अस्तित्व हरविले

By admin | Published: March 28, 2016 12:32 AM

लहानपणी आई-आजीच्या गोष्टींमध्ये हमखास येणारे पात्र म्हणजे चिऊताई. ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ असे सांगताना ...

आधुनिकीकरणाचा फटका : प्रदूषणामुळे घटतेय संख्याभंडारा : लहानपणी आई-आजीच्या गोष्टींमध्ये हमखास येणारे पात्र म्हणजे चिऊताई. ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ असे सांगताना आई अंगणात, झाडावर वावरणाऱ्या चिऊताईला सहज दाखवायची. परंतु आज ही चिऊताई दिसेनाशी झाली आहे. पूर्वी माणसांमध्ये न भिता, बिनधास्तपणे घरामध्ये इकडून-तिकडे वावरणारी चिऊताई अचानक माणसांना सोडून कुठे फुर्र झाली आहे, हे समजेनासे झाले आहे. मानवी सहवासातून गायब झालेल्या या चिमुकल्या पक्ष्याचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न म्हणून पर्यावरणप्रेमींनी केला. पक्षिप्रेमींनी शहरी वातावरणात चिमणीचा शोध घेतला असता तिच्या अस्तित्वाचे गंभीर संकट निदर्शनास आले. तान्ह्या बाळांना अतिशय आवडणारी चिऊताई सहज आपल्या घरात वावरायची. अंगणात धान्य निवडताना चार दाणे टाकले की चिमणीचा थवा हमखास तो टिपायला जवळ यायचा. नाही नाही म्हणता भुर्रकन उडूनही जायच्या. अंगणात, घराच्या आडोशाला, अगदी भिंतीवर टांगलेल्या फोटोंच्या मागे चिऊताईचे घरटे सहज तयार व्हायचे. आईला ‘काय स्वयंपाक केला?’ हे विचारण्यासाठी थेट स्वयंपाकघरापर्यंत चिऊताईचे अस्तित्व असायचे. मात्र या गोष्टी आता कथा- कादंबऱ्यांमध्येच दिसाव्यात अशा वाटतात. विकासाच्या हव्यासात मानवाने या पक्षी-प्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे. घरटी बांधायला जागा नाही, जवळपास झाडे नाही, अशा परिस्थितीत त्या राहणार कुठे. त्यापेक्षा गंभीर म्हणजे शहरात वाढलेले प्रदूषण, वाहनांचा भो-भो आवाज आणि नवे संकट म्हणजे मोबाईल टॉवरचे रेडिएशन. यामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवाय उन्हाळ्यात निर्माण होणारे जलसंकट चिमण्यांसह इतरही पक्ष्यांच्या जीवावर उठले आहे. अशा परिस्थितीत इवलीशी चिऊताई शहरात राहणार कशी? मानवी हव्यासाने जैवविविधतेचे संतुलन किती बिघडले, चिमण्यांच्या कमी झालेल्या अस्तित्वातून याचे गंभीर संकेत मिळत आहेत. चिमण्यांसोबतच अन्य पक्षांचेही अस्तित्व कमी होत चालले आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे आता महत्वाचे झाले आहे. अन्यथा, अशावेळी ‘या चिमण्यांनो परत फिरारे, घराकडे..’ अशी आर्त हाक पर्यावरणप्रेमींना घालावी लागत आहे. (शहर प्रतिनिधी) सिमेंटच्या जगात आश्रयाला जागा नाहीपूर्वी ग्रामीण आणि शहरी भागात मातीच्या खापरांची घरे होती, मोठमोठे वाडे होते. हळूहळू शहरी भागातील हे वाडे, घरे जमीनदोस्त झाली. सिमेंट, काँक्रिटच्या जंगलांनी शहरे वेढली गेली. रस्त्यांवरच्या झाडांच्या कत्तली झाल्या. रस्ते उघडे झाले. सिमेंट काँक्रिटच्या वन बीएचके, टू बीएचके सदनिकात चिमण्यांना घरटी बांधायला जागाच राहिली नाही. सिमेंटच्या बंगल्यातही त्यांना आश्रय उरला नाही. परिणामी माणसांना आपला सहवास नकोसा झाला की काय, असे वाटून चिमण्यांनीही शहरातून आपले बस्तान हलविले, नव्हे घरच सोडले.