शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

स्वस्त डाळ पुरवठ्याचा शासनाचा दावा फोल

By admin | Published: November 17, 2015 12:34 AM

स्वस्त धान्य दुकानात १०० रुपये दराने तूर डाळीचे वाटप करण्यात येईल, अशी राज्य शासनाने घोषणा केली असली तरी ...

विलास श्रुंगारपवार यांचा आरोप : पवनी तालुक्यातील धान खरेदी बंदचभंडारा : स्वस्त धान्य दुकानात १०० रुपये दराने तूर डाळीचे वाटप करण्यात येईल, अशी राज्य शासनाने घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र स्वस्त धान्य दुकानात १३० रुपये दराने डाळ विकली जात असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री विलासराव श्रुंगारपवार यांनी केला आहे.तूर डाळ गरिबांनी खावूच नये कां? असा सवाल करीत ते म्हणाले, स्वस्त धान्य दुकानात १३० रुपये किलो डाळ असून बाजारात १५० रुपये किलो आहे. त्यामुळे या दुकानाकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. अन्न पुरवठा विभागाने विविध ठिकाणी तपासणी केली असली तरी आतापर्यंत एकही कारवाई केलेली नाही. गोदामाअभावी धान खरेदी केंद्र बंदपवनी तालुक्यात गोदामाअभावी धान खरेदी केंद्र बंद आहेत. आमगाव (आदर्श) येथील गोदाम देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यांनी आदेश दिले तर हे गोदाम तातडीने उपलब्ध होऊ शकते. याशिवाय चकारा येथे गोसेखुर्द विभागाचे गोदाम आहेत. या विभागाने परवानगी दिल्यास गोदाम उपलब्ध होऊ शकतात. यापूर्वी या योजनेसाठी हे गोदाम देण्यात आलेले आहेत. त्यामुळे यावेळी कुठलिही अडचण नाही. परंतु उदासिन लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांमुळे पवनी तालुक्यातील धान खरेदी बंद असल्याचा आरोपही माजी राज्यमंत्री श्रुंगारपवार यांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)