शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

भारनियमनाविरूद्ध शेतकरी आंदोलन करणार

By admin | Published: January 28, 2017 12:34 AM

मागीलवर्षी पावसाळ्यात कृषीपंपासाठी आठ तास वीज मिळत होती. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते.

लोकप्रतिनिधींना आश्वासनांचा विसर : शेतकरी संकटमोचन समितीचा आरोपसाकोली : मागीलवर्षी पावसाळ्यात कृषीपंपासाठी आठ तास वीज मिळत होती. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी या शेतकऱ्यांना आश्वासने देण्यात आली होती. मात्र आता तीच आश्वासने लोकप्रतिनिधींनी पाळली नाहीत. परिणामी पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समितीने आयोजित पत्रपरिषदेत दिला.पावसाळ्यात पावसाने दगा दिला दुसरीकडे आठ तास वीज पुरवठ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे रोवणे झाले नाही. ज्यांची रोवणी झाली होती त्यांना विजेअभावी पाणी पुरत नव्हते. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा माराव्या. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. हे आंदोलन १० दिवस सुरू राहिले होते. शेवटी खासदार नाना पटोले व महावितरणचे अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन वीज पुरवठा ८ तासावरून १२ तास केला. पुन्हा चार तास वीज पुरवठा वाढवून देऊ, असे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन पुर्ण झाले नाही. ऐनवेळी निसर्गाने साथ दिल्यामुळे पीक घरी आले.आता उन्हाळी पिकासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली. काही शेतकऱ्यांची रोवणी सुरू झाली. मात्र वीज आठ तासच मिळत आहे. त्यामुळे आठ तासाच्या विजेने पीक होईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे त्यामुळे येत्या ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता श्रीसंत लहरीबाबा मठ साकोली येथे तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीत शासनाने २४ तास वीज पुरवठा करावा व भारनियमन बंद करावे, धानाला ३ हजार पाचशे रूपये प्रती क्विंटल भाव द्यावा, आधारभूत धान खरेदी केंद्र आॅक्टोंबर महिन्याच्या सुरवातीला सुरू करावे, वन्य व हिस्त्रप्राण्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास २० लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात यावी, वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, या मागण्यावर चर्चा करण्यात येईल व शासनातर्फे या मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीचे साकोली तालुका अध्यक्ष राम महाजन यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अविनाश ब्राम्हणकर, डॉ.अजय तुमसरे, नंदकिशोर समरीत, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, मोतीराम कापगते, अशोक बोरकर, लीलाधर लांजेवार, गुलाब उके, देवराव कापगते, मारोती कापगते व बाबुराव बहेकार उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)