शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
3
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
4
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
5
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
6
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
7
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
9
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
10
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
11
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
12
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
13
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
14
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
15
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
16
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
17
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
18
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
19
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

शेतकरी संघटनेचे साखळी उपोषण

By admin | Published: August 22, 2016 12:33 AM

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे कृषीपंपधारक शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे.

सालेभाटा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे कृषीपंपधारक शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे. अन्नदाता शेतकरी न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असून शेतकरी संघटनेने साखळी उपोषण सुरू केले आहे.लाखनी तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तर वीज वितरण कंपनीच्या भारनियमनामुळे कृषी पंपधारक वैतागले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे धनंजय लोहबरे यांचे नेतृत्वात तहसील कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण समोर सुरु केले आहे. लाखनी तालुक्यातील भारनियमन बंद करून २४ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा तसेच शासन नियमानुसार खरीप हंगाम २०१५-१६ मधील तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदत मिळावी. या न्याय मागण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. १६ आॅगस्टला शेतकऱ्यांचा वीज वितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी आश्वासन देण्यात आले. परंतु समस्या मार्गी लागली नाही. मागण्यांसाठी शेतकरी संघटना पदाधिकारी धनंजय लोहबरे, माणिक टिचकुले, नंदलाल काडगाये, घनश्याम हजारे, रतीराम हजारे, गुणीराम वंजारी, दिनेश वासनिक, मनोज पटले, मोरेश्वर भुते, मोहन बुराडे, सुधाकर शेंदरे, सुरेश बोपचे, ताराचंद टिचकुले आदींनी साखळी उपोषण सुरू केले आहे. (वार्ताहर)