शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
2
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
5
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
6
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
7
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
8
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
9
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
10
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
11
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
12
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
13
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
14
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
15
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
16
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
17
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
18
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
19
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
20
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

पाण्यासाठी शेतकऱ्याचा हल्लाबोल

By admin | Published: October 10, 2015 12:55 AM

भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या खरबी परिसरात धान पिकासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला.

खरबी पेंच कार्यालयातील प्रकारपुंडलिक हिवसे खरबी भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या खरबी परिसरात धान पिकासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. या परिसरातील सुमारे ५०० शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाच्या खरबी कार्यालयावर हल्लाबोल करुन पाणी सोडण्याची मागणी केली. दरम्यान, एका शेतकऱ्याने घरुनच गळफास घेऊन या कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मागील महिनाभरापासून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाच्या कार्यालयाला निवेदन दिले. मात्र सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नाही. शासनाच्या नियमानुसार ‘टेल टू हेड’ असे पाणी वितरणाचे नियम असूनही ‘हेड टू टेल’ याप्रमाणे पाण्याचे वितरण करण्यात येत आहे. खरबी परिसरामध्ये येणाऱ्या खराडी, राजेदहेगाव, परसोडी, नांदोरा, ठाणा परिसरामधील धान पीक पाण्याअभावी करपू लागले आहेत. मागील वर्षी राजदहेगाव, खराडी, नांदोरा येथील धानपिक पाण्याअभावी करपले होते. त्यामुळे राजेदहेगाव येथील शेतकऱ्यांनी आंदोलन करुन गाव दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी बाध्य केले होते. यावर्षीही असाच प्रकार असतानाही पेंच प्रकल्पाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आज ५०० शेतकऱ्यांनी या कार्यालयावर मोर्चा नेला. एका शेतकऱ्याने गळफास लावण्याच्या प्रयत्न केला परंतु शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे तो टळला. सायंकाळपर्यंत पाणी नांदोरा, राजेदहेगाव टेलवर न पोहचल्यास आत्मदहन करण्याच्या इशाराही शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग सहायक अभियंता डी. एच. गायधने यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पेंच प्रकल्पाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे अन्यथा आंदोलन करण्यात येईल. सरकार शेतकऱ्यांचे असुनसुध्दा शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, याची खंत वाटत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे, पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम यांनी व्यक्त केली.धानाला परिसरातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी रात्री ११.३० वाजता गेले असता त्यांना काही शेतकऱ्यानी शस्त्रे दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ते परत आले. असे असले तरी या शेतकऱ्यांना पाणी पुरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.- डी.एच. गायधने, सहायक अभियंतापेंच पाटबंधारे विभाग शाखा खरबी.यावर्षी अत्यल्प पावसामुळे धानपीक संकटामध्ये आहे. यासाठी मी या वारंवार कार्यालयाला भेटी देऊनसुध्दा शेतकऱ्यांना पाणी पुरविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे अधिकारी असमर्थ ठरले आहे. दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल.- चंद्रप्रकाश दु्ररुगकर, जि.प. सदस्य ठाणा