शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

पोळा सणातही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 12:01 PM

शेतकरी संकटात : याद्या तयार असल्याने मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी २०२४ चे अवकाळी पावसाने धान पिकांचे कडपे नुकसानग्रस्त झाले. यानंतर खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यात पुरांचे पाणी धान पिकांत शिरले. दोन्ही हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तलाठ्यांमार्फत तयार करण्यात आलेल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांचे खात्यात आर्थिक मदत पोहोचली नाही. परिणामी पोळा सणांवर विरजण पडले आहे.

राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बचत खात्यात अनुदान घातले जात आहे. लाडक्या बहिणीला दीड हजाराची आर्थिक मदत दिली जात असली त्यांचे शेतकरी कुटुंब मात्र आर्थिक मदतीच्या अपेक्षेत आहेत. उन्हाळी २०२४ वर्षात शेतकऱ्यांची उन्हाळी धानाचे पीक घेतले आहे. धानाची कापणी केल्यानंतर शेतात धानाचे कडपे ठेवले. अवकाळी पावसाने धानाचे कडपे ओलेचिंब झाले होते. धानाचे कडप्यांना कोंब फुटले होते. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. 

उन्हाळी धान पिकांचे नुकसान झाले असता तलाठ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. याद्या तयार करण्यात आल्यानंतर महसूल विभागात सादर करण्यात आले आहेत. परंतु उन्हाळी धान पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. 

वैनगंगा आणि बावनथडी नद्याचे काठावर अनेक गावे आहेत. पावसाळ्यात या नद्यांना दोनदा पूर आलेला आहे. पुरांचे पाणी ओसरल्यानंतर धान पिकांचे नुकसान झाले आहे. पूर शिरले नसल्याचे पंचनामे तलाठ्यांच्या पथकाने करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे. परंतु या पंचनाम्यावर सरपंच यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. पुरांचे पाणी ओसरल्यानंतर महिनाभरात नुकसान दिसून येत आहे.

पुरांचे पाणी शिरलेल्या शेतात धान पिकांना अनेक रोगराईने ग्रासले आहे. यानंतर पुन्हा पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. पूर शिरलेल्या धान पिकांचे नुकसान झाले असल्याचे पंचनामे सरपंच यांनी दिले आहेत. या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. परंतु या महत्त्वपूर्ण प्रश्नावर कुणी बोंबलत नाहीत. पोळा सण दारात असताना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली नाही.

उन्हाळी आणि खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना छदामही शेतकऱ्यांचे बचत खात्यात देण्यात आला नाही. शेतकरी संघटनाही आता मैदानात उतरण्यासाठी तयार झालेल्या आहेत. भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर यांनी आर्थिक मदतीच्या मागणीवरून पोळा फुटणार असल्याचे सांगितले आहे.

वर्षानुवर्षांपासून शेतकऱ्यांचे नुकसान सिहोरा परिसरात नद्याचे काठावर गावे आणि शेती असल्याने पुरांचे पाणी शेतात शिरत आहे. धान पिकांचे नुकसान होत आहे. पुरांचे पाण्याची नोंद घेण्यासाठी यंत्रणा वेळेवर पोहोचत नाही. मुख्यालयात कुणी वास्तव्य करीत नाहीत. पूर ओसरल्यानंतर पुरांचे पाणी शिरले नसल्याचे शेरा देऊन मोकळे होत आहेत. हा वंचित करण्याचा डाव असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पुरांचे पाणी शिरत असल्याने सरसकट नोंद करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :bhandara-acभंडारा