शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

उपसा सिंचनमुळे ४३ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 17:13 IST

नरेंद्र भोंडेकर यांनी घेतला आढावा : नियोजन करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडून सांगवारी आणि धारगाव या दोन उपसा सिंचन योजनांना मंजुरी मिळाली आहे. धारगाव उपसा सिंचन योजनेमुळे १८ गावांतील शेतकऱ्यांना तर, सांगवारी योजनेमुळे पेच प्रकल्पाच्या काळव्याच्या टेलवर निर्भर असलेल्या २९ गावांतील ७,०३१ हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे. ४३ गावांना सिंचनाचा लाभ देणाऱ्या या योजनेच्या कामाचा आ. नरेंद्र भोंडेकर यांनी चर्चेतून आढावा घेतला.

भंडारा व पवनी तालुक्यांतील चार उपसा सिंचनसंदर्भात विदर्भ पाटबंधारे महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक सोनटक्के आणि अन्य अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीदरम्यान हा आढावा घेण्यात आला.

या सोबतच तीरीं मिन्सी उपसा सिंचन, कातखेडा उपसा सिंचन प्रकल्पाची मंजुरी आणि नेरला व खापरी (रेहपाडे) या गावांच्या पुनर्वसन संदर्भातही चर्चा करण्यात आली. सांगवारी आणि धारगाव या योजनांच्या प्रथम टप्प्याच्या निधीलाही सरकारने मंजुरी दिली आहे. या दोन्ही - प्रकल्पाची कामे तातडीने सुरू करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी अभ्यासपूर्ण काम करण्याची सूचना भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. योजनेची कामे लवकरात लवकर प्रारंभ करून विस्तारित करण्यासोबत सिंचन योजनेशी विविध विषयांवर चर्चा आवश्यक सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. पवनी तालुक्यातील नेरला उपसा सिंचन योजने अंतर्गत क्षेत्रातील ११ गावांना तत्काळ समाविष्ट करण्यासंदर्भातही निर्देश देण्यात आले.

नेरला व खापरी (रेहपाडे) च्या पुनर्वसनावर चर्चा• या बैठकीत नेरला व खापरी (रेहपाडे) या गावांचे पुनर्वसन करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पुनर्वसनाकरिता लागणाऱ्या अतिरिक्त निधीसाठी सरकारच्या सिंचन नियामक मंडळाकडे लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देण्यात आले.• पवनी तालुक्यातील गुडेगाव, खातखेडा व नचेगाव या तीनही गावांना गोसे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यामध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीनेही चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Drip Irrigationठिबक सिंचनfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा