शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तुटपुंज्या निधीने रखडला गाेसेखुर्द प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST

पवनी तालुक्यातील गाेसे खुर्द येथे वैनगंगा नदीवर पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला ३१ मार्च १९८३ राेजी प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत ३७२.२२ काेटी रुपये हाेती. गत ३४ वर्षांत सातत्याने महागाई वाढली आणि प्रकल्पाची किंमतही वाढत गेली. केंद्रीय जलआयाेगाने २०१७ मध्ये १८ हजार ४९४.५७ काेटी रुपयांची सुधारित मान्यता दिली. २०२१-२२ मध्ये या प्रकल्पाची किंमत २१ हजार काेटींपर्यंत गेलेली असणार आहे.

अशाेक पारधीलाेकमत न्यूज नेटवर्कपवनी : रखडलेला गाेसे खुर्द राष्ट्रीय प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्णत्वास जाण्यासाठी दरवर्षी दीड हजार काेटींची आवश्यकता असताना राज्य अर्थसंकल्पात केवळ ८५३ काेटी ४५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. या तुटपुंज्या निधीत हा प्रकल्प कसा पूर्ण हाेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पवनी तालुक्यातील गाेसे खुर्द येथे वैनगंगा नदीवर पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला ३१ मार्च १९८३ राेजी प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत ३७२.२२ काेटी रुपये हाेती. गत ३४ वर्षांत सातत्याने महागाई वाढली आणि प्रकल्पाची किंमतही वाढत गेली. केंद्रीय जलआयाेगाने २०१७ मध्ये १८ हजार ४९४.५७ काेटी रुपयांची सुधारित मान्यता दिली. २०२१-२२ मध्ये या प्रकल्पाची किंमत २१ हजार काेटींपर्यंत गेलेली असणार आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब लागला. त्यामुळे महागाईच्या निर्देशांकानुसार किंमत वाढत गेली. मात्र, शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे अद्यापही पूर्ण क्षमतेने सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली नाही.केंद्र सरकारच्या ६० टक्के व राज्य सरकारच्या ४० टक्के निधीची तरतूद आहे. मात्र, पुरेसा निधी अद्यापही मिळाला नाही. उपसा सिंचन प्रकल्पाचे कामही अपूर्ण आहेत. हा प्रकल्प पूर्ण कसा हाेणार, असा प्रश्न आहे.

कालव्यांसह उपसा सिंचनचे काम अर्धवट- तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन २२ एप्रिल १९८८ राेजी करण्यात आले. या धरणाचे काम २००८ ला पूर्ण झाले. पंरतु, उजवा व डावा कालवा, उपकालवे अद्यापही पूर्ण हाेऊ शकले नाही. नेरला, माेखाबर्डी, आंभाेरा, टेकेपार उपसा सिंचन याेजना पूर्णत्वासाठी आवश्यक निधी देण्यात आला नाही. त्यामुळे अपेक्षित सिंचन झाले नाही.

गाेसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे काम दाेन वर्षात पुर्ण करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. ४ हजार काेटींची गरज आहे. केंद्र सरकार ६० टक्के व राज्य शासन ४० टक्के याप्रमाणे निधी उपलब्ध करुन देत आहे. तरतुदीनुसार वेळेत निधी मिळाला तर डिसेंबर २०२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करुन सिंचन सुविधा देता येईल.- रा. गाे. शर्मा, कार्यकारी अभियंता गाेसे प्रकल्प

गाेसेखुर्द प्रकल्प उजव्या कालव्याचे काम मध्यल्या टप्प्यात अपूर्ण आहे. घाेडेझरी कालव्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च झाला. परंतु कालवा अपूर्ण आहे. अधिकारी व कंत्राटदारात समन्वय नाही. त्यामुळे काम संथगतीने सुरु आहे. हे गाेडबंगाल शाेधून काढण्यासाठी १९ मार्च राेजी जनमंचने सिंचन शाेध यात्रा आयाेजित आहे.- ॲड. गाेविंद भेंडारकर, संयाेजक, गाेसखुर्द संघर्ष समन्वय समिती 

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प