शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

२४ तास थ्री फेस वीज द्या

By admin | Published: January 03, 2016 1:08 AM

परिसर चुलबंद खोऱ्यात येत असल्याने भूजलसाठा अपेक्षित मिळत आहे. विहिर, बोअरवेलला पाणी आहे ....

शेतकऱ्यांची मागणी : सहायक अभियंता पंकज आखाडे यांना निवेदनपालांदूर : परिसर चुलबंद खोऱ्यात येत असल्याने भूजलसाठा अपेक्षित मिळत आहे. विहिर, बोअरवेलला पाणी आहे पण नियमित वीज मिळत नसल्याने पीक घेताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने २४ तास थ्री फेज वीज पुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबबात सहायक अभियंता पंकज आखाडे यांना शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने निवेदन दिले. सध्या मागणी नसल्यामुळे २४ तास थ्री फेज वीज अनपेक्षितपणे मिळत आहे. ज्यादिवशी ऊन वाढून पिकाला पाण्याची गरज पडेल तेव्हा महावितरण केवळ ८ ते १० तासच वीज पुरविते. यामुळे पिकाला पाणी मिळायला अडचण निर्माण होते. पाणी आहे, पण वीज नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची होते. त्यामुळे महावितरण ने नियमितता दाखवत आजच्या धर्तीवर पुढेही २४ तास वीज द्यावी अशा मागणीचे निवेदन घोडेझरीचे पोलीस पाटील सुनील लुटे, पाथरीचे उपसरपंच जितेंद्र उटाणे यांनी निवेदनातून आपल्या व्यथा अभियंता आखाडे यांच्या समोर मांडल्या.सध्या मिळत असलेल्या वीजेच्या भरोशावर धानपीक वाढविले आणि पुढे जर वीज कमी केली तर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे उद्याचे नुकसान होऊ नये याकरिता महावितरण कंपनीने विचार करता वीज उत्पादन बऱ्यापैकी असल्याने आणि शहरातील काही उद्योग बंद पडल्याने वीज वापर कमी होत असल्याचे बोलले जाते. बंद उद्योगधंद्याची वीज ग्रामीण भागात पुरवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. पालांदूर महावितरण कंपनी वीज चोरीचे व तुटीचे प्रमाण कमी होऊन शून्य पोलवर वीज देण्याचा सपाटा यामुळे वीज ग्राहकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नियमित २४ तास विजेची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.शेतीपंपाच्या मीटरचे रिडींग न घेता वारेमाप वीज बील दिल्या जाते. महावितरणने पारदर्शकता आणून जळालेला विीेचेच बिल शेतकऱ्यांना देण्याची मागणीसुध्दा करण्यात आली आहे. २०० फुटापर्यंत केबलवर वीज कनेक्शन दिले जात आहे. त्यामुळे कनेक्शन देण्यास अंतराचे कारण पुढे करीत नाकारले जात आहे. लोकप्रतिनिधींनी संबंधित जिल्हा वीज अधिकाऱ्यांना जाब विचारुन ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)