शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

वृक्षतोडीच्या घटनांमध्ये वाढ

By admin | Published: March 14, 2016 12:26 AM

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती हे संत तुकारामांचे शब्द वृक्षतोडीने नि:शब्द बनून पक्ष्यांची स्वरे दुर्मिळ होत आहेत.

वनविभाग सुस्त, तस्कर मस्तपर्यावरणासाठी धोक्याची घंटाभंडारा : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती हे संत तुकारामांचे शब्द वृक्षतोडीने नि:शब्द बनून पक्ष्यांची स्वरे दुर्मिळ होत आहेत. वृक्षांमुळे पर्यावरण शुद्ध गंधीत राहून पक्षी सुस्वरात आळवितात. वृक्षतोडीने किती थकलेल्या प्राण्यांचा विसावा हरपणार. हे अनभिज्ञ असलेल्या व पैशाच्या मोहात संतांच्या शिकवणीचा बाजार मांडलेल्या, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत वृक्षांची कत्तल ही बदलत्या पर्यावरणात धोक्याची घंटी आहे.पूर्वी गावाशेजारी घनदाट अरण्य व आमराई तथा मोठे बाभूळबन असायचे. क्वचित सागवन, बेहडा, हिरडा, आवळा यासारख्या वनस्पती औषधी गुणांसोबतच बहारदार सुगंधाने पर्यावरणाचा समतोल राखत असत. गावाशेजारी अरण्यात फिरणारे पशू पक्षी सुद्धा डोलात विहारत असत. रस्त्याने जातांना उन्हात तहान भूक लागली तरी आमराईची सावली विसावा देवून तहानभूक हरवून जायची. ‘शुष्क काष्ठ तिष्ठत्येग्रे’ या संस्कृत म्हणीप्रमाणे वाळलेले झाड सुद्धा सुशोभीत असते. पण हवा, माती, पाणी राहिले पण झाडांची कत्तल सुरू झाली. बिजे पणजोबांनी पुरीले, फळे चालखे नातवंडांनी, पुण्याई गुरुंची शिष्य सानीयानी फखले. घनदाट आमराईने श्रृंगारलेले गाव वृक्षतोडीने वाळवंटासारखे दिसत आहेत.गावात तथा रस्त्याच्या कडेला वृक्ष लावा वृक्ष जगवा म्हणून दरवर्षी शासन कोट्यवधी रुपये खर्चून जोगवा मागतो. योजना अंमलात आली की झाडे जगतच नाही. होते काय तर मंत्र्यांपासून गावच्या संत्र्यांपर्यंत ‘मामला फायनल’ केला जातो. वडिलोपार्जीत फळांचे, औषधीगुणांचे झाड तोडू नका ते तोडल्यास मोठ्या कार्यवाहीला समोर जावे लागेल असा कायदा आहे किंवा नाही व कायदा आहे तर कारवाई वनविभाग का करीत नाही. तलाठी शासकीय व रस्त्यालगतची झाडे तोडण्याचा सात बारा कसा देतो, असेअनेक प्रश्न भ्रष्ट नितीने अनुत्तरीत आहेत. झाडे लावा झाडे जगवा अशा प्रभात फेऱ्या शाळकरी मुलं सुद्धा गावातून काढतात. या अनभिन्न मुलांना सुद्धा बदलत्या पर्यावरणाचा धोका आहे. हे संदेश देणारी मुलंही रस्त्यावरील गावाशेजारील व शेताशिवारातील झाडं विकणाऱ्या किंवा कुऱ्हाडीने कत्तल करणाऱ्या कंत्राटदारांचीच असतील. पण पैशासाठी वाट्टेल ते करायला कुणीही मागे पुढे पाहत नाही.रस्त्यातून उन्हात जाणाऱ्या पादचाऱ्यांना तहान भुकेने व्याकुळ झाल्यानंतर झाडांच्या सावलीचा विसावा हवा असतो. वानरांना अन्नासोबत कड्या मारायला झाड हवे असते. पक्षांना किलबिलासाठी तथा पृथ्वीवरील संपूर्ण प्राण्यांना पर्यावरणासाठी झाड हवे असते ते झाडच तोडले तर पर्यावरणाचा समतोल राहील का? याचा विचार करूनच झाड तोडणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)