शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

अतिवृष्टीची झळ; शेतकरी वळले पीक विम्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:27 PM

७९,०८० संख्येने वाढ : यंदा १.९७ लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गतवर्षी खरीप हंगामात १,१८,०९८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढला होता. यंदा हंगामाच्या प्रारंभीच अतिवृष्टी व पुराचा फटका बसला. त्यामुळे यंदा १,९७,१७८ शेतकऱ्यांनी एकूण ८६ हजार ६५९ हेक्टरचा पीक विमा उतरविला आहे. गतवर्षापेक्षा यंदा ७९,०८० शेतकरी संख्या वाढली असून पिकांना सुरक्षा कवच मिळाले आहे; परंतु गतवर्षी पिकांचे नुकसान होऊनही विमा मिळालेला नव्हता. निदान यंदा तरी नुकसानीचा विमा मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

भंडारा जिल्ह्यात दरवर्षी शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशा विपरीत परिस्थितीत पिकांना विम्याचे संरक्षण लाभावे, यासाठी यावर्षी १ लाख ९७ हजार १७८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदविला आहे. पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांत मोहाडी तालुका आघाडीवर आहे. यावर्षी एकूण विमा संरक्षित रक्कम ४१६.०१ कोटी एवढी आहे, तर विमा काढणाऱ्या शेतकऱ्यात कर्जदार शेतकरी संख्या १,३८,०९९ तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ४१,०७९ एवढी आहे. 

पीक विमा काढलेले तालुकानिहाय शेतकरी तालुका                                   शेतकरी संख्या भंडारा                                           २३६९० मोहाडी                                          ३१६७८ तुमसर                                           १९८५४ पवनी                                             २५२४७ साकोली                                         २६७६० लाखनी                                          २७७४० लाखांदूर                                         २४५०९ एकूण                                        १,९७,१७८

या पिकांना विमा लागू खरीप हंगामात धान या पिकासाठी सर्व ४० महसूल मंडळे अधिसूचित आहेत. तसेच सोयाबीनसाठी भंडारा, मोहाडी, लाखांदूर व पवनी तालुक्यांतील २६ महसूल मंडळे अधिसूचित आहेत. धान व सोयाबीन पिकासाठी विमा लागू आहे. केंद्र शासनाने गेल्यावर्षीपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात विमा उतरण्याची सुविधा केली आहे. 

लाडकी बहीण' मुळे वाढली होती मुदत यंदा शासनाने पीक विमा काढण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत दिली होती; परंतु याच कालावधीत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. पीक विमा काढण्यास अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विमा काढण्याची मुदत शासनाने ३१ जुलैपर्यंत वाढवली होती.

शेतकऱ्यांत निराशेचे वातावरणदरवर्षी पीक विमा उतरवूनही नुकसान भरपाई मिळत नाही, अशी ओरड शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे यावर्षी पीक विमा उतरविण्यासाठी शेतकरी तयार होत नव्हते. मागील वर्षी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण दरवर्षी पाहावयास मिळते, हे विशेष. 

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेतीFarmerशेतकरी