शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

पावसाच्या दडीने उकाडा वाढला पुन्हा सुरू झाली कुलरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:59 IST

पावसाळ्याचे दिवस असूनही उष्णतेत वाढ होत असल्याने पुन्हा शासकीय निमशासकीय कार्यालयात तर, काही घराघरामध्ये पंखे, कुलरची घरघर सुरू झाली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे महागडे बि-बियाण्याची शेतात पेरणी केली.

ठळक मुद्देदुबार पेरणीची गडद छाया। जमिनीबाहेर निघालेले अंकुर पाण्याअभावी करपले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्याचे दिवस असूनही उष्णतेत वाढ होत असल्याने पुन्हा शासकीय निमशासकीय कार्यालयात तर, काही घराघरामध्ये पंखे, कुलरची घरघर सुरू झाली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे महागडे बि-बियाण्याची शेतात पेरणी केली. जमिनीबाहेर बिजाअंकुर आले. परंतू पाण्याअभावी हिरवेगार वाऱ्यावर डुलणारे बिजाअंकुर आता करपण्याच्या मार्गावर दिसत आहेत.यावर्षी पाऊस लांबणीवर पडला त्यामुळे खरीप हंगामातील धान पऱ्हे तसेच तूर, कापूस, सोयाबिन, मका व इतर पिकाची पेरणीही शेतकऱ्यांनी उशिरा सुरू केली. रोहणी, मृग, व अर्धाअधिक आद्रा नक्षत्र कोरडा गेल्यानंतर जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. दमदार पावसाने कोरड पडलेल्या नद्या नाल्यांना ओले करून त्यात पाण्याची धार आली. परंतू पुन्हा पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले पिक हिरवेगार दिसत असतांना पुन्हा आकाशात ढगाळ वातावरण निवळले गेले. त्यामुळे सुर्याचे दर्शन होवून पुन्हा वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे.वातावरण बदलाचा परिणाम आजारावर सुध्दा पडत आहे. त्यामुळेच मानवासोबत पशुप्राणी यांनाही आजाराचा सामना करावा लागत आहे. वातावरणात बदल होत असल्याने त्याचा थेट खरीप हंगामाच्या पिकावरही परिणाम पडत आहे. पाऊस उशिरा व तेही अल्प पडल्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने खरीप हंगामाची पेरणी तर उरकुन घेतली, पण पाऊस असाच दगा देत राहील तर खरीप हंगामाचे काही खरे नाही. .शेतात पिक निघाले की त्याला भावही मिळत नसते. शेतकºयांना पिकाच्या उत्पादन खचार्साठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. त्याचे व्याज वाढू नये यासाठी मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना आपला माल विक्री करावा लागतो. अव्वाच्या सव्वा व्याज आकारून सावकार शेतकऱ्यांची पिळवणुक करतो. त्यामुळेच पिक निघाल्यावरही इकडे आड तिकडे विहिर अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली असते.आता मागील तीन वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबून बेजार झाला आहे. यावर्षी काहीतरी हातात पडेल अशी आशा असतांना आता त्या बिजा अंकुराला निसर्गाच्या पावसाची गरज आहे. त्यामुळेच पुन्हा केव्हा पाऊस येईल, यासाठी शेतकºयांची नजर आकाशाकडे लागली आहे.शेती व्यवसाय धोक्याचानिसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाच्या उत्पादनात सातत्याने घट येत आहे. आता रासायनिक खताचे भावही गगनाला गेले आहे. शेतमजूर मिळेनासे झाले आहेत. शेतात काम करणे कठीण झाले आहे. शेतीचा व्यवसाय धोक्याचा झाला आहे. आतापासून दुष्काळाचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी शेतकरी हा विविध कारणांमुळे दुखावला जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस