शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

कत्तलीस जाणाऱ्या दीड हजार जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:28 PM

कतलीसाठी जाणाऱ्या दीड हजारावर जणावरांची विविध ठिकाणी सुटका करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे. १२९ जणांवर गुन्हे दाखल करुन सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१२९ आरोपी : पाच कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कतलीसाठी जाणाऱ्या दीड हजारावर जणावरांची विविध ठिकाणी सुटका करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे. १२९ जणांवर गुन्हे दाखल करुन सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह विविध मार्गावरुन जनावरांची निर्दयपणे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. कतलीसाठी ही जनावरे नेली जातात. याविरुध्द पोलिसांनी मोहीम उघडून वर्षभरात एक हजार ४४७ जनावरांची मुक्तता केली. या सर्व जनावरांची रवानगी गोरक्षणमध्ये करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्राणी संरक्षण कायद्यान्वये ७७ प्रकरणे दाखल करण्यात आली असून यात ७४ वाहने जप्त करण्यात आली आहे.जानेवारी महिन्यात ४४ जनावरांची सुटका करुन तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात ५१ जनावरे, एप्रिल महिन्यात ७३, मे महिन्यात १०५ जूनमध्ये ५४, जुलै २५८, आॅगस्ट ४७१, सप्टेंबर २२, आॅक्टोबर १९, नोव्हेंबर १९, डिसेंबर ०४ अशी जनावरांची सुटका झाली. या प्रकरणात १२९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर गोमांस विक्री प्रकरणात जिल्ह्यात १७ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३०२ किलो मांस जप्त करण्यात आले. तर २० जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनात विविध पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.