शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

आयसीटी लॅब धूळ खात

By admin | Published: February 03, 2017 12:38 AM

राज्य शासनाच्या उदासिनतेमुळे ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी आयसीटी शिक्षकांअभावी संगणक शिक्षणापासून वंचित राहात आहेत.

शिक्षकांचा करार संपला : विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचितसासरा/सानगडी : राज्य शासनाच्या उदासिनतेमुळे ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी आयसीटी शिक्षकांअभावी संगणक शिक्षणापासून वंचित राहात आहेत. एकीकडे डिजिटल इंडियाची घोषणा सुरू असतानी राज्य शासनाची उदासिनता संगणक शिक्षणालाच कायमचा संपवण्याचा विचार करत असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटी संगणक शिक्षकांचा करार संपल्याने माध्यमिक शाळांमधील आयसीटी लॅब धूळखात पडल्या आहेत. परिणामी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे डिजिटल होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.देशातील माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पायाभूत संगणकीय शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूने केंद्र शासनाने २००८ सालापासून जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये लाखो रूपये खर्च करून आयसीटी योजना केंद्र व राज्य शासनाच्या संयुकत सहकार्याने ७५-२५ टक्के आर्थिक सहभागातून सुरू केली. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून संगणकीय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची आयसीटी निदेशक (शिक्षक) म्हणून नियुक्त्या केल्या. शाळांना किमान १०-२० संगणकासह सर्व सोयी सुविधायुक्त संगणक लॅब उपलब्ध करून दिल्या. जवळपास ८ हजार आयसीटी शिक्षक नेमल्या गेले. मात्र नूतनीकरणाच्या नावाखाली प्रत्येक वर्षी मुलाखती घेवून संबंधित कंपन्यांनी ११ महिन्यांचा करार करून पहिल्या टप्प्यातील ५०० व दुसऱ्या टप्प्यातील २५०० शिक्षकांना घरी बसवले. संगणक शिक्षकांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची संघटनेकडून मागणी होत आहे.महाराष्ट्र शासनाच्या उदासिनतेने राज्यातील लाखो विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची बाब पुढे आली आहे. मग ही योजना नेमकी कोणासाठी हा प्रश्न कायम दिसून येत आहे. शासन शिक्षणासारख्या गंभीर विषयावर विचार करणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो विद्यार्थ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. एकीकडे पंतप्रधान डिजिटल इंडियाची घोषणा करत आहेत मग लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याचा धोका समोर दिसत असतानासुद्धा डिजीटल इंडिया संकलपनेला छेद देण्याची भूमिका भाजपाचे राज्यसरकार का घेत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. (वार्ताहर)