शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मधमाश्यांचे पोळे नष्ट कराल तर होईल तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:19 IST

Bhandara : आग लावून, कीटकनाशक फवारून नष्ट कराल, तर बसेल जबर दंड !

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मधाच्या हव्यासापोटी व त्यातून दोन पैसे मिळतात, म्हणून मधमाश्यांच्या पोळ्याला आग लावून कीटकनाशक फवारून ते नष्ट करण्याचा प्रयत्न होत असतो, मात्र हा प्रयत्न तुम्हाला महागात पडू शकतो. वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये मधमाश्यांच्या संदर्भात उल्लेख असून, कलम ५०, ५१ नुसार तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा २५ हजार रुपये ते एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो. आग लावून ते नष्ट करणे अयोग्य असून, तो कायद्याने गंभीर गुन्हा आहे.

निसर्गाच्या जीवनचक्रामध्ये मधमाश्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मधमाश्या परागीभवनाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परागीभवन, म्हणजे वनस्पतीमधील प्रजननाचा महत्त्वाचा भाग. परागीभवन झाले, तरच वनस्पती आपले बीज तयार करू शकतात.

मोहोळ अडचणीचे ठरल्यास जवळच्या मोहोळ होळणाऱ्या माहीतगार व्यक्तीला बोलावून त्याला उठून लावावे. एकदा दोनदा मोहळ उठून लावल्यानंतर ते पुन्हा त्या जागेवर येण्याचे टाळते. मधमाश्यांच्या परागीकरणावरच पिकांच्या उत्पादनात वाढ होते. त्यामुळे मधमाश्यांचे पोळे अघोरीपणे नष्ट करणे कायद्याने गुन्हा ठरेल. 

"मधमाश्यांशिवाय वनस्पतीमधील परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. आइनस्टाईनच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवरून मधमाश्या संपल्या, तर परागीभवन थांबेल आणि परागीभवन थांबले, तर वनस्पतीचे बीज तयार होणे थांबेल. सरळसरळ विचार केला, तर उत्पन्न घटेल. परिणामी, आपल्या अन्नाचा तुटवडा निर्माण होऊन माणूस मधमाश्यांशिवाय फक्त चार वर्षे जगू शकेल."- प्रा. अशोक गायधने, कार्यवाह, ग्रीनफ्रेंड्स, लाखनी

"जर कोणी मधमाश्यांचे पोळे जाळले किंवा त्यावर औषध फवारून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर तो एक गंभीर गुन्हा आहे. या कृतीमुळे पर्यावरणाचे नुकसान तर होतेच; पण मधमाशांही नष्ट होतात. शिवाय कायद्याचेही उल्लंघन होते. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मध्ये कलम २ (३१) मध्ये मधमाश्यांच्या पोळ्याच्या संदर्भात स्पष्ट उल्लेख असून, कलम ५०, ५१ नुसार तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा २५ हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो." - नदीम खान, माजी मानद वन्यजीव रक्षक, भंडारा.

टॅग्स :bhandara-acभंडारा