शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने माडगी येथे रेतीचा अवैध साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:26 AM

* * *माडगी शिवार बनला रेती तस्करीचा अड्डा, * * *रेती माफियांची नियोजित फिल्डिंग,शेतकरी त्रस्त * रेती चोरीमुळे करोडोचा ...

* * *माडगी शिवार बनला रेती तस्करीचा अड्डा,

* * *रेती माफियांची नियोजित फिल्डिंग,शेतकरी त्रस्त

* रेती चोरीमुळे करोडोचा महसूलला चुना

तुमसर : जिल्ह्यात सर्वात जास्त रेतीची तस्करी ही तुमसर तालुक्यातून होत आहे. सध्या रेती घाटाचा लिलाव झालेला नाही. तरीही वैनगंगा नदीच्या माडगी घाटातून रेतीचा बेसुमार उपसा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असून या घाटातून रेतीची सर्रास ओव्हरलोड तस्करी सुरू आहे. याकडे तहसीलदार सह पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून ते बघ्याच्या भूमिकेत आहेत. रेती माफियांसोबत सेटिंग असल्यामुळे कुणीच अधिकारी कारवाई करीत नाही , रेती माफियाचे पोलिस व महसूल विभागासोबत मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याणे येथे कुठलीही कारवाई होत नसल्याची चर्चा परिसरात आहे.

तालुक्यातील माडगी गावात रेती माफियाच्या टिप्पर वाहनांच्या वर्दळीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांवर रेती, माती व धुळीचा थर बसत असल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. दररोज जवळपास ५० ट्रक ओव्हरलोड रेतीची तस्करी होत असल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसुलला चुना लागत आहे. याबाबत तहसीलदारांना एक आठवडा पूर्वी माडगी घाटावर होत असलेल्या रेती उपसाबाबत व रेतीच्या अवैध साठा बाबत विडिओ क्लिप पाठवून माहिती देण्यात आली होती तेव्हा तहसीलदार तुमसर यांनी आता टीम पाठवतो असे सांगितले मात्र त्या दिवशी कोणतीच कारवाही झाली नसल्याने दुसऱ्या दिवशी परत त्यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठविण्यात आले त्यावेळी मी स्वतः तिथे जातो असे सांगून वेळ मारून नेली दरम्यान अवैध रेती घाटावर कोणतीही कारवाई न झाल्याने दररोज जवळपास ४० ते ५० ओव्हरलोड ट्रक रेती नागपूरला विकल्या जात आहे.यामुळे रोजचा शासनाचा जवळपास ८ लाखांचा महसूल लंपास होत आहे .मात्र यावर ठाणेदार व तहसीलदार काहीच करवाई करीत नाही .केली तरी महसूल विभागा एखादं ट्रॅक्टरवर थातूरमातूर कार्यवाही केली जाते. रेती माफियांशी साटेलोटे ठेवून अधिकारी मात्र मालामाल होत आहेत. रेती माफियांना प्रत्येक वाहनापोटीचा हप्ता ठरविला गेला आहे ट्रँक्टरकरिता ५ हजार तर ट्रकसाठी मनमानी हप्ता रेती माफिया देत असल्याची चर्चा आहे. यामुळे रेती माफियांना रान मोकळे आहे .

रेती माफियांना पोलिस व महसूल विभागाला हाताशी धरून दररोज लाखोंची उलाढाल करून शासनाच्या हातावर तुरी ठेवण्याचे काम करीत आहे. यात बीट जमादार , मंडळ अधिकारी व पटवारी हेही रेती तस्कराना मदत करतात . शिवाय यात पोलिस व महसूल विभागाचे लोकंही गुंतले आहे. परिणामी आज रक्षकच भक्षक बनले आहेत. अशी परिस्थिती दिसून येते त्यामुळे

परिसरातील नागरिक त्रस्त व घाबरलेले आहेत.यात शेतकऱ्यांची अवस्था सांगुच नका .आधीच पाण्यासाठी बेजार झालेला शेतकरी कुठून तरी पाणी आणून इंजिनद्वारे शेताला पाणी देत आहे.अख्खी रात्र नहरावर जागून काढत आहे.मात्र रेतीचा रात्रंदिवस उपसा करणाऱ्या वाहनामुळे शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला.कधी कुठले वाहन अंगावर येईल याचा बेत नाही.शिवाय सतत वाहनांच्या वर्दळीमुळे पिकांवर रेती, माती व धुळीचा थर बसलेला आहे .वाहनांनी धुरे तोडले आहे