शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

बेरोजगार अभियंत्यांवर अन्याय

By admin | Published: March 19, 2016 12:29 AM

तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यावर होणारा राजकीय अन्याय थांबवून जनतेच्या पैशाची होणारी लुट थांबवावी..

पत्रपरिषदेत आरोप : चौकशीची केली मागणीसाकोली : तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यावर होणारा राजकीय अन्याय थांबवून जनतेच्या पैशाची होणारी लुट थांबवावी व सदर प्रकरणातील तालुक्यातील कामाची चौकशी करून दोषी विरूद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी उमेश कठाणे, विनायक देशमुख व ओम गायकवाड यांनी साकोली येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.शासनाने विकास कामासाठी तीन लाख रूपयापेक्षा जास्त रकमेच्या कामाची ई निविदा काढून काम देण्याचे धोरण जाहीर केले. ही कामे मजुर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना ई निविदा अंतर्गत देण्याचेही नियम आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला कामे वाटप करताना सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद (राज्य) मध्ये नोंदणीकृत अभियंता ही एक अट घालून कामे वाटप करतात. शासनाचे विविध विभागातर्फे विकास कामाचे वाटप सुशिक्षित बेरोजगारांना केले जाते. तालुक्यातील काही ग्रामपंचायत अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार यांना वाटप करण्यासाठी आरक्षीत विकास कामासाठी अट ब, क, ई हेतु पुरस्पर टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे तीन वर्षे आतमध्ये त्यांना पदविका व पदवी सुबे अ हे पात्र ठरवत नाही. शासन धोरणाप्रमाणे सुबे अ ला विकास कामे भेटलीच पाहिजे आणि त्यांची बेरोजगारी दुर होऊन त्यांना अधीक बळ भेटलाच पाहिजे. परंतु विशीष्ठ राजकीय ठेकेदारांना लाभ पुरविण्यासाठी तीन वर्षाच्या आतील सुबे अ ला जवळून त्यांच्यावर अन्याय होत आहे. निविदा, शर्ती व अटी ब, क, ई या घालुन सुबे अ मध्ये नाममात्र स्पर्धा कागदोपत्री दाखवून विशीष्ठ मर्जीतल्या ठेकेदारांना काम देण्याचे धोरण राबविले जात आहे. सुशिक्षित बेरोजगार अ च्या नावाखाली दुसऱ्यांना काम वाटप केले जात आहे. निविदामध्ये स्पर्धा नसल्यामुळे जनतेच्या लाखो रूपयाची लुट केली जात आहे. त्यांना अ ला तीन वर्षापेक्षा जास्त अनुभवाची अट टाकल्यामुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात सहा ते सात पात्र अभियंता शिल्लक राहिलेले आहेत. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त अभियंता सुबे ज्या अटी व शर्ती मध्ये बसत नाही मात्र जनतेच्या पैशाची उधळपट्टी त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. सुशिक्षित बेरोजगार यांना नियमाप्रमाणे जाचक अटी वगळून स्पर्धात्मक निविदा मागविल्या असत्या तर हिच कामे १५ ते २० टक्के कमी दराने मंजुर होवून लाखो रूपयाची बचत झाली असती आणि उरलेल्या पैशातून आणखी कामे करता आली असती. जिल्ह्यात केवळ पाच ते सहाच अभियंत्याची कामे होत आहेत. यातील बरेचशे अभियंते हे दहा वर्षाच्या अटीमध्ये अपात्र आहेत. त्या अपात्र सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे कशी काय दिली जातात याचीही चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी या पत्रपरिषदेतून करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी )