शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

अधिकाऱ्यावर शाई फेकली

By admin | Published: July 30, 2015 12:46 AM

अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांच्यावर हल्ला करणे किंवा चुकीचे आरोप करुन बदनामी करण्याचे प्रकार भंडारा जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलनभंडारा : अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांच्यावर हल्ला करणे किंवा चुकीचे आरोप करुन बदनामी करण्याचे प्रकार भंडारा जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्यावर झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणाच्या आरोपानंतर २८ जुलै रोजी पुन्हा एका अधिकाऱ्यांच्या अंगावर शाई टाकून त्यांची मानहानी करण्याचा व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा गंभीर प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन संबंधितांना अटक करावी, जेणेकरुन अशा बाबींना आळा बसेल यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना निवेदन देण्यात आले आहे.जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक बा.सु. मरे हे काल मंगळवारला आपल्या कार्यालयात कामकाज करीत होते. त्यावेळी सुशिक्षित बेरोजगार सोसायटीचे भंडारा जिल्हाध्यक्ष भूपेंद्र मिश्रा हे कार्यालयात मरे यांना भेटायला आले. त्यांनी जिल्हा माहिला व बाल विकास कार्यालयात कामासाठी ५ ते ६ लोकांची मागणी केली होती. त्या कामाबाबत काय झाले अशी मरे यांना विचारणा केली. मात्र विभागाने दिलेल्या अटी व शर्तीची पुर्तता न केल्यामुळे त्यांचा प्रस्ताव परत पाठविल्याचे सहाय्यक संचालक मरे यांनी मिश्रा यांना सांगितले. त्यावर मिश्रा यांनी तुम्ही इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठिशी घालता असे आरोप करीत पिशवीमधून काळया रंगाची शाईची बॉटल काढून मरे यांच्या चेहऱ्यावर व कपड्यांवर शाई टाकली. सोबत आणलेला प्लॉस्टीक चपलांचा हारही त्यांच्या गळयात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी सहाय्यक संचालक यांनी कर्मचाऱ्यांना कक्षात बोलाविले असता शर्मा यांनी चपलांचा हार कार्यालय परिसरात टाकून तिेथून पळ काढला. याप्रकरणी सहाय्यक संचालक मरे यांनी भंडारा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली. तथापि पोलिसांनी अद्याप संबंधितांना अटक केलेली नाही. ही बाब गंभीर असून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे. मिश्रा यांनी शासकीय कामात अडथडा निर्माण करुन शासकीय अधिकाऱ्यांची मानहानी केली. यासाठी त्यांना तात्काळ अटक करावी आणि पोलिस कोठडी द्यावी यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना बुधवारला निवेदन दिले.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरण शासनाकडे पाठवून शासकीय अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण्यात निर्माण करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई न झाल्यास माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या निधनानिमित्त घोषित केलेला शासकीय दुखवटा संपल्यानंतर महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेकडून काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनिल पडोळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संघटन सचिव डॉ.संपत खिल्लारी , भंडारा जिल्हा समन्वय समितीचे महासचिव शांतीदास लुंगे, तिनही उपविभागीय अधिकारी तसेच अन्य सर्व विभागांचे ७० अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)