शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

आली रे आली, आता नवतलावाची पाळी आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:26 AM

भंडारा : एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यात तलावांची अधोगती होतेय. एकट्या भंडारा शहरात डझनभर तलाव अस्तित्वात होते; ...

भंडारा : एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यात तलावांची अधोगती होतेय. एकट्या भंडारा शहरात डझनभर तलाव अस्तित्वात होते; मात्र त्यापैकी फक्त चार ते पाच तलाव शिल्लक आहेत. त्यातही मिस्किन टॅंक तलावाला अतिक्रमणधारकांनी वेढा घातला आहे; तर आता शास्त्रीनगर परिसराला लागून असलेल्या नवतलावालाही ‘दृष्ट’ नजर लागली आहे. हे तलाव पूर्णतः गिळंकृत करण्याचा सपाटा काहींनी लावल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शहरातील अन्य तलवांप्रमाणे आली रे आली, आता नवतलावाची पाळी आली, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

भंडारा शहरात सागर तलाव, नवतलाव, जोगी तलाव, खांबतलाव, मिस्किन टॅंक तलाव यासह अन्य सखल भागात लहान तलाव व डबके अस्तित्वात होते. कालानुरूप वस्ती वाढत गेल्याने या तलावांची जागा मोठमोठ्या वस्त्या व इमारतींनी घेतली. त्याला बुजवून वस्ती व आलिशान कॉम्प्लेक्स उभारण्याचे काम जोरात सुरू झाले. पाहता-पाहता भंडारा शहरातील डझनभर तलावांची संख्या चार ते पाचवर आली आहे. आता तर चक्क तलाव बुजवून त्यावर प्लॉटस् उभारण्याचा मनसुबा काहीजणांचा असल्याचे दिसून येते. सर्वप्रथम तलाव रिकामा करून त्यावर सूर्यफूल उगवण्याचे धाडस करण्यात आले. यानंतर तो तलाव नसून, शेतजमिनीची जागा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता तर हा तलाव पूर्णतः अतिक्रमित करून त्यावर प्लॉटस् आखण्याचे काम हाती घेण्यात येत असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. मात्र नागरिकांच्या नजरेआड हा सगळा गोरखधंदा सुरू आहे. काही जागरूक नागरिकांनी यावर आवाज बुलंद केला असता, त्यांनाही दाबण्याचे प्रयत्न करण्यात आले. कधी दमदाटी, तर कधी बळाचा वापरही करण्यात येत असतो. मात्र जमीन तस्करांनी आता तलावांना पुन्हा एकदा टारगेट केले आहे, हीच खरी या शहराची शोकांतिका म्हणावी लागेल.

बॉक्स

जिल्हाधिकारी लक्ष घालणार काय?

शास्त्रीनगर परिसराला लागून असलेल्या नवतलाव हा २७ एकर जागेत आहे. नियमाप्रमाणे तलावातील पाणी काढता येत नाही. अतिक्रमण करणे ही बाब तर कायद्याने गुन्हा आहे. मात्र पाणी क्षेत्र रिकामे करून त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. माती टाकून हळूहळू नवतलावाचे क्षेत्र कमी करण्यात आले. आता याप्रकरणी जिल्हाधिकारी याकडे लक्ष घालतील, तर या तलावाला नवसंजीवनी मिळू शकेल. अन्यथा हा तलावसुद्धा काळानुरूप नाहीसा होईल, यात शंका नाही