शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
2
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
3
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
4
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतली विशेष काळजी; जवळच्या लोकांना भेटायला न येण्याचे केले आवाहन
5
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
6
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
7
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
8
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
9
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
10
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
11
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
12
बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत
13
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
14
'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं
15
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
16
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
17
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
18
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
19
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
20
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन

लवारीत पावसासाठी कलश दिंडी

By admin | Published: August 20, 2016 12:23 AM

गाव परिसरात पाऊस पडावा आणि जलजीवन सुखी व्हावे. सोबतच गावात शांतता नांदावी ...

४९ वर्षांची परंपरा : सातव्या दिवसी झाला समारोपलवारी : गाव परिसरात पाऊस पडावा आणि जलजीवन सुखी व्हावे. सोबतच गावात शांतता नांदावी यासाठी रक्षाबंधनाला गावकरी कलश दिंडीचे आयोजन करतात. हा दिंडी कार्यक्रम सात दिवस चालतो. मागील ४९ वर्षांपासून ही दिंडी लवारी येथे काढण्यात येत अूसन संपूर्ण ग्रमास्थ या दिंडीत मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने सहभागी होतात.या दिंडीची सुरूवात सन १९६७ पासून नामदेव क्षिरसागर महाराज यांच्या संकल्पनेतून सुरू झाली. १९६७ व्या सालात गावात धान पेरणी झाली होती. परे आले पण रोवणीसाठी पाऊस पडलाच नाही. आणि धान परे करपत होते. पाऊसाअभावी गावात रोवणीच झाली नाही. त्यामुळे गावातील शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. त्यावेळी नामदेव क्षिरसागर महाराज यांच्याकडे गावकऱ्यांनी धाव घेवून त्यांना याबाबत विचारणा केली. महाराजांनी ग्रामस्थांना सांगितले की, समोर येणाऱ्या रक्षाबंधनाचे औचित्य साधून जर गावातील हनुमान मंदिरातून लहान मुलीच्या डोक्यावर कलश घेवून गावातील सर्व मंदिराना प्रदक्षिणा घालून गावातून प्रभातफेरी काढून त्याचा समारोप हनुमान मंदिरात करावा. त्यानंतर कलशामधील पाणी तिथे सोडायचे आणि सातव्या दिवसी त्याचा मोठ्या भक्तीभावाने समारोप करायचा तेव्हाच पाऊस पडेल.ही गोष्ट लक्षात घेता त्या वर्षात कलश दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीतील मुला मुलींना गंगाबाई पालीवाल यांनी मरेपर्यंत भोजनदान करण्याचे ठरविले. दिंडीच्या शेवटच्या दिवसाला रात्री पावसाने दमदार हजेरी लावली व गावातील रोवणी सुरू झाली, अशी आख्यायीका आहे. त्याची परंपरा मोठ्या भक्तीभावाने पार पडते. तेव्हापासून गेल्या ४९ वर्षांपासून श्रद्धेपोटी लवारी येथे हा उपक्रम सुरू आहे. यंदाही ताळ, ढोलकीच्या तालावर ही दिंडी काढण्यात आली. यात गावातील महिला दिंडीचे पूजन करतात. या कार्यक्रमाला देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष गजानन किरणापुरे, उपाध्यक्ष पुरूषोत्तम कापगते, सचिव दामोधर गोटेफोडे, आसाराम किरणापुरे, बाबुराव नगरीकर, रामचंद्र नागरीकर, लेसमन लांजेवार, देवचंद करंजेकर, यादोराव मेश्राम, चंद्रशेखर कापगते, मोहन समरीत, आत्माराम सोनकुसरे, विजय कटंकार, ताराचंद कटंकार, वसंता कटंकार, मुखरू शेंडे, नंदलाल साखरे, तिर्थराज कोसरे, गोपिचंद किरणापुरे, गौरीशंकर पांडे, शिक्षक टी.टी. कावळे, कल्पना बोडेलकर, निर्मला वाडीभस्मे, पोलीस पाटील विनोद किरणापुरे, मोरेश्वर नगरीकर, डोमा देशकर, मारोती कडूकार यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी गावातील सर्व समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)