शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

ताणतणाव नियंत्रणात ठेवा; मधुमेह, उच्च रक्तदाबाचा वाढतोय धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 2:06 PM

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम : मधुमेहाने वयाचे बंधन नाकारले, प्रतिबंध गरजेचा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : बदलती जीवनशैली, नोकरी, व्यवसायात निर्माण होणाऱ्या ताणाचा तसेच व वाढत्या स्पर्धेचा खूप मोठा परिणाम आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली पाहावयास मिळत आहे.

आता कोणत्याही वयाचे आणि वर्गवारीतील लोक मधुमेहाच्या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे आगामी वर्षात या रोगाचे प्रमाण अधिक वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. काही वर्षांमध्ये झपाट्याने लोकांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. त्याचा मोठा परिणाम आरोग्यावर होऊन जिल्ह्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे.

केवळ नियंत्रण हाच पर्याय• साधारण १५-२० वर्षापूर्वी मधुमेह हा उच्च वर्गापुरताच मर्यादित असणारा आजार होता. त्यामुळे चेष्टेने त्याला श्रीमंतांचा आजारही म्हटले जायचे. पण, आता सर्वच स्तरांतील लोकांची जीवनशैली बिघडली आहे. त्यामुळे आता कोणत्याही आर्थिक वर्गात मधुमेहाचे रुग्ण आढळतात. चोरपावलांनी शरीरात प्रवेश करणाऱ्या या आजाराला नंतर फक्त नियंत्रित ठेवता येते. त्यातून पूर्ण बरे होता येत नाही. म्हणूनच योग्य वेळेत जीवनशैली सुधारून मधुमेह टाळणे हाच पर्याय आहे.

प्रतिबंधाचे कार्य अवघडटाइप वन मधुमेह हा आयुष्यभराचा आणि जीवनशैलीशी निगडित आजार आहे. नियमित देखरेख आणि व्यायाम यांना सुयोग्य आहाराची जोड दिल्यास मधुमेह नियंत्रित होऊ शकतो. मात्र, तसे होताना दिसत नसून मधुमेहग्रस्तांची संख्या वाढत आहे.

मुले, महिला मधुमेहाच्या विळख्यातबदलत्या जीवनशैलीमुळे बालकांमधील वाढता मधुमेह ही मोठी समस्या बनली आहे. वाढते जंकफूडचे प्रमाण आणि खाण्याच्या चुकीच्या वेळा, यामुळे मधुमेह होण्यासाठी पूरक असे वातावरण तयार झाले आहे, चुकीच्या जीवनशैलीमुळे या आजारांना मुलांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, महिलांमधील वाढता ताण हे त्यांच्यातील वाढत्या मधुमेहाचे मुख्य कारण आहे.

नवजात अर्भकांनाही मधुमेहमहिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गर्भवती महिलांद्वारे होणाऱ्या बाळाला जन्मतःच मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. याचापरिणाम म्हणजे नवजात बालकांचे कमी असणारे वजन, जन्माच्या वेळी कमी वजन असणाऱ्या बालकांना जास्त खाणे दिले जाते. त्यामुळे नवजात बालकांमध्ये मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

ही आहेत मधुमेहाची कारणे• कामाचा अधिक ताण• डबाबंद पदार्थांचा अतिरेकी वापर चुकीचा आहार व अवेळी जेवण• व्यायामाचा अभाव, योग व सकाळी फिरण्याचा अभाव• गोड पदार्थांचे अतिसेवन • व्यसनाधीनता

शारीरिक हालचाल नाही, बैठे काम करणे, जंकफूड जास्त प्रमाणात खाणे, कॉम्प्युटर, मोबाइल जास्त प्रमाणात वापरणे यामुळे मधुमेह वाढत आहे. त्यासाठी लोकांनी राहणीमान बदलणे आवश्यक आहे. तरच मधुमेहाचे प्रमाण कमी होऊ शकते.- डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा. लोकांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे. मनावरील

ताण कमी करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार व योगासने करणे गरजेचे आहे. कमी झोप घेणे, व्यसनाधीनता, विभक्त कुटुंब पद्धती, वाढता एकटेपणा यामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत.- डॉ. मिलिंद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.

टॅग्स :diabetesमधुमेहchandrapur-acचंद्रपूर